AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, “मी नाही गाणार तुमच्यासोबत”

लतादीदी शांत स्वभावाच्या होत्या. त्या नेहमी मोठ्यांचा आदर करत. पण शांत स्वभावाच्या लतादीदींचं एकदा मोहम्मद रफींबरोबर भांडणं झालं होतं. रॉयल्टीच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष दोघांनी सोबत काम केलं नाही.

शांत स्वभावाच्या लतादिदी जेव्हा मोहम्मद रफींवर भडकल्या, म्हणाल्या, मी नाही गाणार तुमच्यासोबत
लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी
| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 5:47 PM
Share

मुंबई : आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संगीतसृष्टीला फार मोठा धक्का बसलाय. लतादीदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचं व्यक्तिमत्व खुलवलं. आपल्या भक्तीगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाई गीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती. लतादीदी शांत स्वभावाच्या होत्या. त्या नेहमी मोठ्यांचा आदर करत. पण शांत स्वभावाच्या लतादीदींचं एकदा मोहम्मद रफींबरोबर (Mohammad Rafi) भांडणं झालं होतं. रॉयल्टीच्या मुद्द्यावरुन त्यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष दोघांनी सोबत काम केलं नाही.

रॉयल्टीच्या मुद्द्यावर साथ देण्यासाठी त्यांच्या मागे इतरही अनेक गायक कलाकार उभे राहिले. संगीत दिग्दर्शकांप्रमाणेच गायकांनाही रॉयल्टी दिली पाहिजे, असे लता दिदींचं मत होतं. रफी साहेबांवर लिहिलेल्या ‘मोहम्मद रफी : माय अब्बा’ या पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. मोहम्मद रफी यांची सून यास्मिन खालिद यांनी लिहिलेल्या या पुस्तकात म्हटलंय- ‘रॉयल्टीचा मुद्दा लता मंगेशकर यांनी निर्मात्यांसमोर मांडला होता, लताजींना आशा होती की या लढ्यात रफीसाहेबही त्यांना साथ देतील…’

लता मंगेशकरांना आशा होती, पण रफीही मागे हटायला तयार नव्हते

पण मोहम्मद रफी यांचे मत या बाबतीत लता मंगेशकर यांच्यापेक्षा वेगळे होते. रफी साहेब म्हणाले की, “जेव्हा गायकांना त्यांची फी मिळत असते, मग ते कशासाठी रॉयल्टी मागत असतात, त्यात गायकांचा काहीही अधिकार नाही.”

रफीसाहेबांचं म्हणणं ऐकून लता मंगेशकर भडकल्या

लता मंगेशकर यांनी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले होते. त्या म्हणाल्या, त्यावेळी एक बैठक झाली होती. त्या बैठकीत मोठमोठे गायक आणि मोहम्मद रफीही होते. त्या दिवशी त्या बैठकीतल्या चर्चेत अचानक रफीसाहेब उभे राहिले आणि म्हणाले – आजपासून मी लतादीदींसोबत गाणार नाही. हे ऐकून मी त्यांना थांबवलं आणि म्हणाले- ‘तुम्ही काय मीच तुमच्यासोबत गाणार नाही’

‘रफी साहेबांनी पत्र लिहून माफी मागितली होती’

यानंतर काही वर्षे दोघांमधील संवाद थांबला. त्यानंतर लता मंगेशकर यांनी महेंद्र कपूर यांच्यासोबत गाणी गायली. त्यानंतर काही वर्षे उलटून गेल्यावर एके दिवशी दोघांमध्ये संवाद झाला. खरंतर, संगीत दिग्दर्शक शंकर यांनी दोघांना समेट घडवून आणण्यात मोठा वाटा उचलला होता. याबाबत लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की, ‘त्यांनी मला रफी साहब यांचे एक पत्र दिले होते. त्यात त्यांनी माफी मागितली होती. लता मंगेशकर यांच्या या विधानाने नंतर गदारोळही झाला. 2012 मध्ये लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते, तेव्हा मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफीने ही गोष्ट चुकीची असल्याचं सांगितलं होतं. आपल्या वडिलांनी लता मंगेशकर यांना असं काहीच म्हटलं नव्हतं, किंवा तसं पत्रही लिहिलं नव्हती, असं सांगितलं.

लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar: लता मंगेशकर एकमेवाद्वितीय, त्यांचा आवाज अमर राहील; लतादीदींच्या निधनाने पाकिस्तानही हळहळला

Lata Mangeshkar : शरद पवार पंतप्रधान व्हावे, लतादिदींनी व्यक्त केलेली इच्छा-सोलापूरचे माजी महापौर

युगप्रवर्तक गायिका म्हणून 1978 मध्येच बहाल केली होती डीलिट पदवी, शिवाजी विद्यापीठाने म्हटले होते जगावर लतादीदींच्या सुरांचे साम्राज्य

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.