AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन, मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणतात…

Amitabh Dayal Pass Away : बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाळ यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन, मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणतात...
अमिताभ दयाळ (बॉलिवूड अभिनेते)
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 3:33 PM
Share

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाळ (Amitabh Dayal) यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. आज (बुधवारी) पहाटे त्यांचं निधन झालं. बॉलिवूडच्या अनेक महान कलाकारांबरोबर त्यांनी अभिनय केला होता. अमिताभ बच्चन यांच्यापासून ओमपुरींपर्यंत आणि संजय दत्त यांच्यापासून ते जॉन अब्राहम यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार गेल्याची भावना व्यक्त होत आहे. काळाने एक चांगला अभिनेता खूप लवकर हिरावून नेल्याची भावना बॉलिवूड कलाकार व्यक्त करत आहेत.

अमिताभ दयाळ यांच्या पत्नी मृणालिनी पाटील (Mrunalini Patil) यांनी अमिताभ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. बुधवारी पहाटे साडेचार वाजता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं सांगितलं. 17 जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाही झाला होता. त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते.

मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले

आजारी असताना रुग्णालयातून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असूनही आणि मृत्यूशी झुंज देतानाही हार मानायाची नाही, असं ते सांगत होते. एकप्रकारे त्यांनी जीवन जगण्याचं मंत्रच दिला होता.

बुधवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार

अमिताभ दयाळ यांच्यावर आज (बुधवारी) संध्याकाळपर्यंत मुंबईतच अंत्यसंस्कार केले जातील. अमिताभ दयाळ यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला होता. कुटुंबातील काही सदस्य बिलासपूरमध्ये राहतात. अंत्यदर्शनासाठी सध्या त्यांचे नातेवाईक मुंबईत येण्याची दयाळ कुटुंबीय वाट पाहत आहेत.

अमिताभ दयाळ यांनी ‘रंगदारी’ (2012) आणि ‘धुआं’ (2013) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 2000 मध्ये अमिताभ दयाळ यांनी मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्याशी सात फेरे घेतले, मात्र, लग्नाच्या 9 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांना दोन अपत्ये आहेत. अमिताभ दयाल यांनी ओम पुरी आणि नंदिता दास यांच्यासोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ (2003) तसेच अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि संजय दत्त यांच्यासोबतही चित्रपटांमधून काम केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.