AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Leela Bhansali | अखेर संजय लीला भन्साळी यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाले लोक मला गंगूबाई काठियावाडी

प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हवा केली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती.

Sanjay Leela Bhansali | अखेर संजय लीला भन्साळी यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाले लोक मला गंगूबाई काठियावाडी
| Updated on: Feb 18, 2023 | 9:57 PM
Share

मुंबई : चाहते गेल्या काही दिवसांपासून संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या हिरामंडीची प्रतिक्षा करत आहेत. शेवटी शनिवारी त्यांच्या या वेब सीरिजचा फर्स्ट लूक समोर आला. यामध्ये ऋचा चढ्ढा, सोनाक्षी सिन्हा अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला यांची झलक बघायला मिळत आहे. संजय लीला भन्साळी यांचे प्रत्येक चित्रपट (Movie) काहीतरी वेगळ्या आणि हटके स्टोरीवर आधारित असतात. फर्स्ट लुक लॉन्च वेळी संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये अभिनेत्री अलिया भट्ट ही महत्वाच्या भूमिकेत होती. या चित्रपटामध्ये आलियाचा एक वेगळा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाची जवळपास सर्व शूटिंग ही मुंबईमध्ये करण्यात आली होती. हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर संजय लीला भन्साळी यांच्या समस्यांमध्येही मोठी वाढ झाली होती. अनेकांनी हा चित्रपट रिलीज होऊ नये, याकरिता प्रयत्न देखील केले होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हवा केली. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप जास्त मेहनत घेतली होती.

आता चित्रपट रिलीज होऊन इतके दिवस झाले असता, संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दल काही मोठे खुलासे केले आहेत. संजय लीला भन्साळी म्हणाले की, अनेकांनी मला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला होता.

थेट काहीजण म्हणाले होते की, हा चित्रपट अजिबात तू तयार करू नकोस. ते म्हणत होते की गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट महिला केंद्रित आहे. का तुला भारतामध्ये महिलांवरील चित्रपटासाठी दुसरा कोणताही विषय मिळाली नाहीये का? इतकेच नाही तर पुढे संजय लीला भन्साळी म्हणाले की, लोकांनी मला थेट म्हटले की, अशा प्रकारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरत नाहीत.

कारण या चित्रपटाची स्टोरी ही सेक्स वर्करवर आधारित आहे आणि यामध्ये एखादा अभिनेता देखील नाहीये. तरीही गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी केली. मला या माझ्या चित्रपटावर पूर्ण विश्वास होता. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट कोरोनाच्या काळात रिलीज झाला होता.

गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळाले. मात्र, कोरोनाचा थोडाफार फटका चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर झाला. या चित्रपटाला सुरूवातीपासून मोठा विरोध होताना दिसत होता. अनेकांनी या चित्रपटामधील आलिया भट्ट हिच्या भूमिकेचे काैतुक केले होते.

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.