AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Chiranjeevi  | स्टार, मेगास्टार ते राजकीय नेता, वाचा दक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचा प्रवास…

चिरंजीवी हे टॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध अभिनेते आहेत. चिरंजीवी हे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक चर्चेत असलेले अभिनेते मानले जातात. त्याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांची क्रेझ पाहण्यासारखी आहे. हेच कारण आहे की जेव्हा चिरंजीवी चित्रपट सोडून राजकारणाकडे वळले तेव्हा लोकांनी त्यांना तिथेही खूप प्रेम दिले.

Happy Birthday Chiranjeevi  | स्टार, मेगास्टार ते राजकीय नेता, वाचा दक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचा प्रवास...
चिरंजीवी
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 9:04 AM
Share

मुंबई : बॉलिवूडमधील स्टारडम म्हणजे तुमच्या चाहत्यांची संख्या आणि तुमच्या चित्रपटांचे यश. बऱ्याचदा बॉलिवूडचे स्टारडम पाहून लोकांचे डोळे थक्क होतात, पण जर तुम्हाला स्टारडमचा खरा चेहरा पाहायचा असेल तर तुम्ही दाक्षिणात्य सिनेमाकडे वळायला हवे. रजनीकांत आणि चिरंजीवी (Chiranjeevi) या सारख्या कलाकारांचा तेथील जनतेवर असणारा प्रभाव पाहायलाच हवा.

चिरंजीवी हे टॉलिवूडचे सर्वात प्रसिद्ध अभिनेते आहेत. चिरंजीवी हे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक चर्चेत असलेले अभिनेते मानले जातात. त्याच्याबद्दल त्याच्या चाहत्यांची क्रेझ पाहण्यासारखी आहे. हेच कारण आहे की जेव्हा चिरंजीवी चित्रपट सोडून राजकारणाकडे वळले तेव्हा लोकांनी त्यांना तिथेही खूप प्रेम दिले. आज (22 ऑगस्ट) या टॉलीवुड मेगास्टारचा वाढदिवस आहे.

पुरस्कारांची रांग

चिरंजीवी त्यांच्या सर्वोत्तम आणि रेकॉर्ड ब्रेकिंग चित्रपटांमुळे भारतीय माध्यमांमध्ये “मेगास्टार” म्हणून लोकप्रिय आहेत. चिरंजीवी यांना सात वेळा दक्षिण भारतीय फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा नंदी पुरस्कार मिळाला आहे. चिरंजीवी यांना त्यांच्या पहिल्याच हिंदी चित्रपट ‘प्रतिबंध’साठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

बालपणापासून अभिनयाची आवड

चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955 रोजी आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात झाला. चिरंजीवीचे खरे नाव कोनिडेल शिव शंकर वारा प्रसाद आहे. चिरंजीवी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. चिरंजीवी यांनी सीएसआर शर्मा कॉलेज, ओगोळे (आंध्र प्रदेश) मधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते चेन्नईला आले आणि येथे आल्यानंतर त्यांनी अभिनय शिकण्यासाठी मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. 1980 मध्ये त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध विनोदी कलाकार अल्लू राम लिंगैया यांची मुलगी सुरेखाशी लग्न केले. चिरंजीवी यांना दोन मुली (सुष्मिता आणि श्रीजा) आणि एक मुलगा रामचरण तेजा (तेलुगु चित्रपट अभिनेता) आहे.

अभिनय कारकिर्दीची सुरुवात

अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर चिरंजीवी यांनी ‘पुनाधीरल्लू’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘प्रणाम खरीदू’ हा चित्रपट प्रथम प्रदर्शित झाला होता, मात्र त्यातून त्यांना काही जादू दाखवता आली नव्हती. प्रसिद्ध दिग्दर्शक बापू यांच्या ‘मना पुरी पंडावलू’ या चित्रपटातून चिरंजीवी यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. I Love You आणि Idi Katha Kaadu या चित्रपटांमध्ये छोट्या पण प्रमुख भूमिका साकारल्यानंतर चिरंजीवीच्या अभिनय कारकिर्दीला आणखी चालना मिळाली.

1979 मध्ये चिरंजीवी यांचे तब्बल आठ चित्रपट आणि 1980मध्ये तब्बल चौदा मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. यानंतर चिरंजीवीने ‘मोसागडू’, ‘राणी कसुला रंगम्मा’ सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकरून बरीच लोकप्रियता मिळवली .

‘इंद्रा’ने मोडले रेकॉर्ड

1980चे दशक चिरंजीवीच्या कारकिर्दीसाठी खूप महत्वाचे आणि यशस्वी ठरले. नव्वदच्या दशकातही चिरंजीवींनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. 1997 मध्ये त्यांनी ‘हिटलर’ चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयासाठी समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळवली. 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंद्रा’ या चित्रपटाने यशाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले. राजकारणात येण्यापूर्वी चिरंजीवी यांचा शेवटचा चित्रपट ‘शंकर दादा जिंदाबाद’ हा होता.

राजकारणात प्रवेश

2008 मध्ये चिरंजीवी यांनी आंध्र प्रदेशातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याच्या उद्देशाने ‘प्रजा राज्यम पार्टी’ नावाच्या प्रादेशिक राजकीय पक्षाची स्थापना केली. 2009च्या विधानसभा निवडणुकीत चिरंजीवींच्या पक्षाने अठरा जागा जिंकल्या. पण 2011मध्ये त्यांचा पक्ष औपचारिकरित्या आंध्र प्रदेशातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये विलीन झाला. आता पुन्हा एकदा आशा निर्माण झाली आहे की, चिरंजीवी पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळतील.

समाजकार्यातही अग्रेसर

चित्रपट आणि पक्ष या व्यतिरिक्त चिरंजीवी यांची ओळख ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून देखील आहे. चिरंजीवी यांनी 1998 मध्ये ‘चिरंजीवी चॅरिटी ट्रस्ट’ची स्थापना केली होती. ज्यात रक्तपेढी आणि अनेक नेत्र बँका (नेत्रदान केंद्रे) आहेत. आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्या संस्थेला जास्तीत जास्त रक्त मदतनिधी जमा केल्याबद्दल बक्षीसही दिले आहे.

हेही वाचा :

‘उसकी हटेगी तो सबकी फटेगी’, पाहा टायगर श्रॉफ-क्रिती सेनॉनच्या ‘गणपथ’चा दमदार टीझर!

आई कशी, गोड गोड मिठाईच जशी! पाहा ‘अरुंधती’ फेम मधुराणी आणि मिठाईचं हे भन्नाट कनेक्शन

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.