Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटांचं कुठे चुकतंय? RRR, KGF2च्या यशानंतर संजय दत्तने सांगितलं कारण

एस. एस. राजामौली यांचा RRR असो किंवा मग यशची मुख्य भूमिका असलेला 'केजीएफ: चाप्टर 2'.. गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांचंही मार्केट आपल्या नावे केल्याची जोरदार चर्चा होत आहे.

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटांचं कुठे चुकतंय? RRR, KGF2च्या यशानंतर संजय दत्तने सांगितलं कारण
Sanjay DuttImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:28 AM

एस. एस. राजामौली यांचा RRR असो किंवा मग यशची मुख्य भूमिका असलेला ‘केजीएफ: चाप्टर 2’.. गेल्या काही दिवसांत दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांचंही मार्केट आपल्या नावे केल्याची जोरदार चर्चा होत आहे. हे दोन्ही दाक्षिणात्य चित्रपट हिंदीसह विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाले. या चित्रपटांच्या हिंदी व्हर्जननेही बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सध्या ‘केजीएफ 2’ (KGF: Chapter 2) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. यामध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तनेही (Sanjay Dutt) भूमिका साकारली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजूबाबाने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Film Industry) फरक समजावून सांगितला. हिंदी चित्रपटांचं नेमकं कुठे चुकतंय, याविषयी त्याने सविस्तर प्रतिक्रिया दिली.

‘आपण आपल्याच प्रेक्षकांना विसरलोय’

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संजय दत्त म्हणाला, “मला असं वाटतं की हिंदी फिल्म इंडस्ट्री ही आता लार्जर दॅन लाइफ हिरोइझ्मला विसरली आहे. मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी या गोष्टीला विसरली नाही. रॉम-कॉम किंवा हलकेफुलके चित्रपट वाईट असतात असं मला म्हणायचं नाही. पण आपण उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, झारखंड इथल्या प्रेक्षकांना का विसरलो? यापूर्वी आपल्याकडे वैयक्तिक निर्माते आणि फायनान्सर होते, ज्यांना फिल्म स्टुडिओच्या कॉर्पोरेटायझेशनने संपुष्टात आणलंय. कॉर्पोरेटायझेशन चांगलं आहे पण त्यामुळे चित्रपटांच्या आवडीनिवडींमध्ये अडथळा येऊ नये.”

‘ते स्क्रिप्ट पाहतात आणि आपण..’

“उदाहरण द्यायचे झाल्यास, एस. एस. राजामौली यांचे निर्माते ठरलेले असतात, जे त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास ठेवतात. आपल्याकडे असे निर्माते आधी होते. गुल्शन राय, यश चोप्रा, सुभाष घई आणि यश जोहर हे त्यापैकीच आहेत. त्यांनी बनवलेल्या चित्रपटांकडे पहा. दक्षिणेत ते कागदावरील स्क्रिप्ट पाहतात आणि इथं कागदावर रिकव्हरीचे आकडे पाहिले जातात”, असं तो पुढे म्हणाला.

राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने जगभरात तब्बल 1000 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे ‘KGF 2’ने आतापर्यंत जगभरात कमाईचा 500 कोटींचा आकडा पार केला आहे. या आकड्यांवरूनच दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रेक्षकांवरील प्रभाव पहायला मिळतोय. अभिनेता संजय दत्त लवकरच ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, साक्षी तंवर आणि सोनू सूद यांच्या भूमिका आहेत. त्याचा ‘शमशेरा’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

हेही वाचा:

Prabhas: ‘राधेश्याम’ फ्लॉप का झाला? प्रभासने सांगितलं कारण

KGF 2: ‘हा खरा फॅमिली मॅन’; पत्नी-मुलांसोबत समुद्रकिनारी ‘पिकनिक’ करणाऱ्या यशच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस

मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.