AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचं असेल तर..; धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने केली होती डील? दिलं उत्तर

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी नुकताच लग्ना 44 वा वाढदिवस साजरा केला. धर्मेंद्र हे विवाहित असताना हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच त्यांनी ड्रीम गर्लसोबत लग्न केलं होतं. या लग्नासाठी त्यांनी पहिल्या पत्नीसोबत डील केल्याचं म्हटलं जातं.

हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचं असेल तर..; धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने केली होती डील? दिलं उत्तर
Hema Malini with Dharmendra and Prakash KaurImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2024 | 3:29 PM
Share

बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला नुकतीच 44 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त दोघांनी एकत्र लग्नाचा वाढदिवस साजरा केला. हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करताच पुन्हा एकदा धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची चर्चा होऊ लागली आहे. धर्मेंद्र जेव्हा हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, तेव्हा ते विवाहित होते. प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. या दोघांनी सनी, बॉबी, अजिता आणि विजीता ही चार मुलं होती. धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. मात्र या लग्नासाठी त्यांनी पहिल्या पत्नीसोबत एक डील केल्याचं म्हटलं जातं. हेमा यांच्याशी दुसऱ्या लग्नाची परवानगी देण्यापूर्वी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांच्यासमोर एक अट ठेवली होती, अशी त्यावेळी चर्चा होती.

पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरं लग्न करता येणार नसल्याने त्याकाळी धर्मेंद्र यांनी धर्म बदलून हेमा यांच्याशी लग्न केलं. 1980 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर अशा चर्चांना उधाण आलं होतं की हेमाशी लग्न करण्यासाठी परवानगी देण्यापूर्वी प्रकाश कौर यांनी एक अट ठेवली होती. “जर तुम्हाला हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न करायचं असेल तर मुलगा सनी देओलला बॉलिवूडमध्ये लाँच करावं लागेल”, अशी अट त्यांनी ठेवल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर 1983 मध्ये सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर ‘स्टारडस्ट मॅगझिन’ला दिलेल्या एका मुलाखतीत प्रकाश कौर यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती.

“ज्या अटीची एवढी चर्चा होतेय, ते साफ खोटं आहे. यात काहीच तथ्य नाही. सनी हा फक्त माझाच नाही तर धर्मेंद्र यांचाही मुलगा आहे. तेसुद्धा त्यांच्या मुलावर तितकंच प्रेम करतात, जितकं मी करते”, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याच मुलाखतीत प्रकाश कौर यांनी हेमा मालिनी यांच्याविषयीही मत मांडलं होतं. “तिचा धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय चुकीचा होता. मी तिच्या जागी असती तर कधीच कोणाचं घर मोडलं नसतं”, असं त्या म्हणाल्या होत्या. इतकंच नव्हे तर प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांचा बचावही केला होता. हेमा यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्यावर प्रकाश कौर म्हणाल्या होत्या की, “धर्मेंद्र यांच्याशिवाय असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी त्यांच्या पत्नीला सोडून दुसरं लग्न केलं. मात्र माझ्या पतीने असं केलं नाही. ते संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन पुढे जात आहेत.”

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.