गोविंदाच्या मुलीने तीन महिन्यांतच गमावले होते प्राण; पत्नीने सांगितलं दु:ख

गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला. मुलगा यशवर्धनच्या जन्माच्या आधी सुनिता यांनी एका मुलीला जन्म दिला होता. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच त्या मुलीने आपले प्राण गमावले होते.

गोविंदाच्या मुलीने तीन महिन्यांतच गमावले होते प्राण; पत्नीने सांगितलं दु:ख
GovindaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 9:45 AM

अभिनेता गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. करिअरच्या शिखरावर असतानाच त्याने सुनिता अहुजाशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिताने त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टीना ही मुलगी आहे. मुलांसोबत कसं नातं आहे, याविषयी सुनिताने सांगितलं. सुनिता आणि गोविंदा यांना आणखी मुलगी होती. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तिने प्राण गमावले होते. याविषयी सुनिता या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

‘टाइम आऊट विथ अंकित’ या पॉडकास्टमध्ये सुनिताने सांगितलं की तिने मुलाचे खूप लाड केले आणि त्यामागे खूप मोठं कारण होतं. “यशचे खूप लाड झाले कारण तो टीनापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. यशच्या आधी मी एका मुलीला जन्म दिला होता. पण डिलिव्हरीच्या वेळेच्या आधीच तिचा जन्म झाल्याने ती फार काळ जगू शकली नाही. अवघ्या तीन महिन्यांत ती आम्हाला कायमची सोडून गेली. तिची फुफ्फुसं विकसित झाली नव्हती. म्हणूनच मी यशला खूप लाडात वाढवलंय, कारण मी खूप घाबरले होते. आता मला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या लागतात, पण तेसुद्धा ठीक आहे”, असं सुनिता म्हणाली.

हे सुद्धा वाचा

“मी माझ्या दोन्ही मुलांची खूप काळजी घेतली आहे. त्यांना शाळेतसुद्धा मीच घेऊन जायची आणि आणायची. मी कधीच माझ्या मुलांना नॅनीसोबत सोडलं नव्हतं”, असंही सुनिताने स्पष्ट केलं. गोविंदा जेव्हा बी. कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होता, तेव्हा त्याची सुनिताशी भेट झाली होती. “त्यावेळी आमचं अफेअर नव्हतं. कारण मला तो ठीकठाक वाटला होता. तो विरारचा राहणारा होता आणि मी पाली हिल इथली होती. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडू आणि लग्न करू असा विचारसुद्धा त्यावेळी डोकावला नव्हता”, असं सुनिताने सांगितलं.

सुनिता अहुजाने गोविंदाशी 1987 मध्ये लग्न केलं. त्यावेळी गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीत नुकतंच पदार्पण केलं होतं. करिअरवर परिणाम होईल या भीतीने दोघांनी जवळपास वर्षभर लग्नाबाबत गुप्तता पाळली होती. अखेर जेव्हा त्यांची मुलगी एक वर्षाची झाली, तेव्हा गोविंदाने त्याच्या लग्नाचा खुलासा केला होता.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.