AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीर सावरकर यांच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमावर त्यांचे नातू रणजीत सावरकर काय बोलले?

'स्वातंत्र्य वीर सावरकर' यांच्या जीवनावर अधारलेला सिनेमा लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे.... सध्या सर्वत्र रणजीत सावरकर यांच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे...

वीर सावरकर यांच्या आयुष्यावर येणाऱ्या सिनेमावर त्यांचे नातू रणजीत सावरकर काय बोलले?
| Updated on: Mar 18, 2024 | 9:14 AM
Share

मुंबई | 18 मार्च 2024 : भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर ऊर्फ वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा याने सिनेमात वीर सावरकर यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ज्यासाठी अभिनेत्री प्रचंड मेहनत केली. अभिनेत्याची मेहनत सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसली. सध्या रणदीप हुड्डा सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

अभिनेता सिनेमाचं प्रमोशन करत असताना वीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी सिनेमावर पहिली प्रतिक्रिया देत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे. रणजीत सावरकर म्हणाले, ‘रणदीप हुड्डा याच्यासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. मी अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. पण मला माहिती आहे सिनेमासाठी रणदीप हुड्डा याने प्रचंड मेहनत घेतली आहे. त्याने 30 किलो वजन कमी केलं आहे.’

‘सिनेमा एक असं माध्यम आहे, ज्या माध्यमातून भारताचा इतिहास आपण नव्या पिढी पर्यंत पोहोचवू शकतो. मला आशा आहे की त्यांच्यावर आणि इतर क्रांतिकारकांवर आणखी सिनेमे बनतील.’ असं देखील वीर सावरकर यांचं नाती रणजीत सावरकर म्हणाले. सध्या सर्वत्र रणजीत सावरकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा रंगली आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ ?

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमा 22 मार्च रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणदीप हुड्डा याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता अमित सियाल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार असं म्हणायला हरकत नाही.

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाबद्दल काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता वीर सावरकर यांच्याबद्दल म्हणाला, ‘सावरकर माफी वीर नव्हते, ते वीर होते. हिंदुत्वाचे पिता आहेत… मागच्या दोन वर्षांपासून मी हा चित्रपट बनवतोय. मी अडचणींचा सामना केलाय. दोन वर्षांसाठी काळ्या पाण्याची शिक्षा मलाच झाली होती, असं वाटलं. खूप अडचणींवर मात करुन हा चित्रपट बनवलाय.’ असं अभिनेता एका मुलाखतीत म्हणाला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.