AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: ‘लाज वाटली पाहिजे’, पराभवाने दुःखी पाकिस्तान सेलिब्रिटी, विराट कोहलीला म्हणाले…

IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानमध्ये नाराजीचं वातावरण, स्वतःच्या संघाबद्दल Pak सेलिब्रिटी म्हणाले, 'लाज वाटली पाहिजे...', विराट कोहली याच्याबद्दल काय म्हणाले पाकिस्तान सेलिब्रिटी?

IND vs PAK: 'लाज वाटली पाहिजे', पराभवाने  दुःखी पाकिस्तान सेलिब्रिटी, विराट कोहलीला म्हणाले...
| Updated on: Feb 24, 2025 | 11:30 AM
Share

IND vs PAK: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 242 धावांचं आव्हान टीम इंडियाने सहज पार केलं आणि 6 गडी राखून विजय मिळवला. दोन देशांमध्ये रंगलेल्या या सामन्यावर संपूर्ण जगाचं लक्ष होतं. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना रंगला होता. सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानच्या संघाचा दारुन पराभव केला. याचाच उत्साह आज संपूर्ण भारतात पाहायला मिळत आहे. तर पाकिस्तानमध्ये सध्या नाराजीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

भारताचा विजय आणि पाकिस्तानचा परावभ झाल्यानंतर शेजारील राष्ट्राच्या सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक केलं आहे. पाकिस्तान संघाच्या पराभवानंतर पाक अभिनेता असद सिद्दीकी याला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने दुःख व्यक्त केलंय.

‘पुन्हा मन लावयचं, पुन्हा मन मोडायचं… नेहमाचं झालं आहे आते हे… तसं म्हणायला गेलो तर आम्ही देखील पागल आहोत. विजयासाठी कोणती स्टॅटजी नाही, न जिंकण्याचा कोणता एटीट्यूड…, काय बोलायचं आता यावर. बऱ्याच काळानंतर, पाकिस्तानने आयसीसी इव्हेंट होस्ट केलं आणि पाकिस्तानच पहिला संघ आहे जो बाहेर पडला आहे. किती लाज वाटते…’ असं म्हणत असद सिद्दीकी याने खंत व्यक्त केली.

एवढंच नाही तर, असद सिद्दीकी याने भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याचं कौतुक केलं आहे. ‘विराट दुसऱ्या देशातील लोकांचा देखील फेव्हरेट आहे… असं म्हणायला हरकत नाही…’ सध्या सर्वत्र असद सिद्दीकी याच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री माया अली हिने देखील पाकिस्तान पराभूत झाल्यानंतर दुःख व्यक्त केलं. पण विराट कोहली याचं कौतुक केलं. पाकिस्तानी अभिनेत्री उसामा खान हिने देखील नाराजी व्यक्त केली आहे. उसामा म्हणाली, ‘मान्य आहे की जय – पराजयाचा खेळ आहे. पण निदान खेळा तरी…’ सध्या सोशल मीडियावर रविवारी रंगलेल्या सामन्याची चर्चा सुरू आहे. भारताचा विजय झाल्यामुळे समस्त भारतीयांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.