AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाटलेले कपडे, तीन दिवस मिळाला नाही अन्नाचा कणही, जावेद अख्तर म्हणाले, माझी लायकी…

जावेद अख्तर यांनी अत्यंत मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. जावेद अख्तर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोठा संघर्ष केलाय. हेच नाही तर जावेद अख्तर यांच्याकडे एक वेळेची खाण्यासाठीही पैसे नव्हते. मुंबईमध्ये आल्यावर आपल्यासोबत काय काय घडले हे सांगताना जावेद अख्तर हे दिसले.

फाटलेले कपडे, तीन दिवस मिळाला नाही अन्नाचा कणही, जावेद अख्तर म्हणाले, माझी लायकी...
Javed Akhtar
| Updated on: Aug 20, 2024 | 2:33 PM
Share

जावेद अख्तर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केलाय. हेच नाही तर ज्यावेळी ते मुंबईमध्ये आले, त्यावेळी त्यांच्याकडे ना जेवणासाठी पैसे होते ना राहण्यासाठी घर होते. रेल्वे स्टेशन, फुटपाथ, पार्कमध्ये झोपून त्यांनी मुंबईमध्ये दिसल काढले. हेच नाही तर तीन दिवस त्यांना एक अन्नाचा घासही खाण्यास मिळाला नाही. सलीम-़ जावेद यांची डॉक्यूमेंटी ‘द एंग्री यंगमॅन’ प्रदर्शित झालीये. यामध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या संघर्षाचे दिवस कसे होते हे सांगितले आहे. मुंबईत आल्यावर फक्त खाणे आणि राहण्याचाच नाही तर कपड्यांसाठीची त्यांना मोठा संघर्ष करावा लागला.

जावेद अख्तर हे आपल्या संघर्षाच्या दिवसांवर बोलत असताना रडताना दिसले. जावेद अख्तर म्हणाले, भोपाळमध्ये पदवी घेऊन मी मुंबईमध्ये आलो. गुरू दत्त आणि राज कपूर यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न घेऊन मी मुंबई आलो. मुंबईमध्ये एकटा होतो. कधी मित्रांसोबत तर कधी, स्टेशन, पार्क आणि रस्त्यांवर झोपून दिवस काढले. एक वेळ अशी होती की, घालण्यासाठी कपडे देखील नव्हते.

त्यावेळी माझ्याकडे असलेले ट्राउजर इतके फाटले होते की, मी त्याला शेवटचे घातले तर परत घालू शकणार नव्हतो. माझ्याजवळ दुसरे कोणतेही ट्राउजर देखील नव्हते, ते एकच होते. जावेद अख्तर यांनी वयाच्या 15 व्या वर्षी काकूचे घर सोडले. त्यांना कधीच त्यांच्या कुटुंबाकडून कोणतीही मदत घ्यायची नव्हती. जे काही करायचे होते ते स्वत: करायचे होते.  

शबानाने सांगितले की, जावेद अख्तर यांच्या आयुष्यात एकवेळी अशीही आली की, त्यांनी तब्बल दोन दिवस जेवणच केले नाही. जावेद अख्तर भावूक होत म्हणाले की, ज्यावेळी आयुष्यात तुम्हाला जेवणासाठी, राहण्यासाठी मिळत नाही, त्यावेळी त्याचा एक वेगळाच प्रभाव हा आयुष्यावर होतो. ज्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाहीत.

जावेद अख्तर यांनी म्हटले की, आजही मी ज्यावेळी मोठ्या लग्झरी हॉटेलमध्ये जातो. त्यावेळी मला जुने दिवस आठवतात. मला ज्यावेळी ब्रेकफास्ट मिळतो, त्यामध्ये बटर, जॅम, हाफ फ्राई एग्स आणि कॉपी असते. हे सर्व पाहून मी विचार करतो की, तुझी ही लायकी होती? खरोखरच याचा मी हक्कदार आहे? मला वाटते की, असे हे ब्रेकफास्ट माझ्यासाठी नाहीत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.