Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाभारत’मधील द्रौपदीला गाडीतून ओढून 20 जणांनी केला होता हल्ला; दोन वेळा झाला ब्रेन हॅमरेज

22 मे 2016 रोजी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बरमध्ये एका राजकीय पक्षाच्या जवळपास 20 कार्यकर्त्यांनी रुपा यांच्यावर हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांचा दोन वेळा ब्रेन हॅमरेज झाला होता.

'महाभारत'मधील द्रौपदीला गाडीतून ओढून 20 जणांनी केला होता हल्ला; दोन वेळा झाला ब्रेन हॅमरेज
Roopa GangulyImage Credit source: IANS
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 5:42 PM

मुंबई | 23 जुलै 2023 : बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. यानंतर छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेकदा रामायण आणि महाभारत बनवले गेले. परंतु रामानंद सागर आणि बी. आर. चोप्रा यांच्या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ मालिकांनी प्रेक्षकांच्या हृदयात जे स्थान निर्माण केलं, ते आजही कोणतीच मालिका करू शकली नाही. महाभारतातील सर्वांत आव्हानात्मक भूमिका म्हणजे द्रौपदी. हीच व्यक्तीरेखा साकारून अभिनेत्री रुपा गांगुली यांनी लोकांच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण केलं. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या घटनेविषयी तुम्हाला माहीत आहे का?

रुपा गांगुली यांचं करिअर

रुपा गांगुली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘निरुपमा’ या शॉर्ट फिल्मद्वारे केली होती. त्यानंतर त्यांनी ‘मुक्ता बांधा’ या बंगाली मालिकेसह अनेक बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेमुळे त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. यामध्ये त्यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा सीन त्यांनी एकाच टेकमध्ये पूर्ण केला होता असं म्हटलं जातं. मात्र याच सीनदरम्यान त्या सेटवर अर्धा तास रडत होत्या.

दु:शासनाशी कधीच बोलल्या नाहीत

एका मुलाखतीत रुपा गांगुली यांनी सांगितलं होतं की वस्त्रहरणाच्या सीनचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला होता. याच कारणामुळे त्या सीनच्या शूटिंगच्या आधी आणि त्यानंतर त्या दु:शासनाची भूमिका साकारणारे विनोद कपूर यांच्याशी कधीच बोलल्या नाहीत. परंतु व्यक्ती म्हणून ते खूप चांगले होते, असं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

2015 मध्ये राजकीय कारकिर्दीला सुरुवात

रुपा गांगुली यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती, ज्याचा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नसेल. टीव्ही आणि चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर 2015 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र हावडा उत्तर या मतदारसंघातून त्या पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्यसभेसाठी नामांकन मिळालं. रुपा गांगुली यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक गोष्टी घडल्या होत्या.

रुपा गांगुली यांच्यावर मॉब लिंचिंग

22 मे 2016 रोजी पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बरमध्ये एका राजकीय पक्षाच्या जवळपास 20 कार्यकर्त्यांनी रुपा यांच्यावर हल्ला केला होता. हा हल्ला इतका भयंकर होता की त्यांचा दोन वेळा ब्रेन हॅमरेज झाला होता. याविषयीची माहिती खुद्द रुपा यांनी ट्विट करत दिली होती. त्यांनी सांगितलं की त्यांना कारमधून बाहेर खेचण्यात आलं होतं. यामध्ये पोलीसदेखील सामील होते. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली होती. या घटनेनंतर रुपा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना दोन वेळा ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला होता. रुपा गांगुली यांनी स्वत:ला कलाविश्वापासून दूर केलं असलं तरी त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत.

आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.