AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

200 Halla Ho Review : एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’

चित्रपट '200 हल्ला हो' (200 Halla Ho) ही एक अशी कथा आहे, जी कदाचित तुम्हाला रडवेल किंवा तुमचे डोळे तरी पाणावतील... हा चित्रपट पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवतो. असा समाजा जिथे आजही म्हणजे 21व्या शतकातही, जात आणि धर्माच्या बाबतीत एकमेकांविरुद्ध एक मोठा गट कार्यरत आहे.

200 Halla Ho Review : एक अशी कथा जिने समाजातील जातपात भेदभाव करणाऱ्यांना लगावली चपराक! वाचा कसा आहे रिंकूचा ‘200 हल्ला हो’
zee5 च्या "200- हल्ला हो" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, प्रेक्षकांची उत्कंठा फारच वाढली आहे. याची कारणंही तसंच आहे, जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचं मोठ्या काळानंतर पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि सत्यघटनेवर प्रेरित दमदार कथानक.
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 1:38 PM
Share

मुंबई : चित्रपट ‘200 हल्ला हो’ (200 Halla Ho) ही एक अशी कथा आहे, जी कदाचित तुम्हाला रडवेल किंवा तुमचे डोळे तरी पाणावतील… हा चित्रपट पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवतो. असा समाजा जिथे आजही म्हणजे 21व्या शतकातही, जात आणि धर्माच्या बाबतीत एकमेकांविरुद्ध एक मोठा गट कार्यरत आहे. विशेषतः दलित लोकांसोबत होणारा भेदभाव. ही कथा दलित समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर भाष्य करते.

सार्थक दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर बऱ्याच काळानंतर पडद्यावर परतले आहेत. या चित्रपटात रिंकू राजगुरू, सलोनी बत्रा, इंद्रनील सेन गुप्ता आणि फ्लोरा सेनी सारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट एका सत्य घटनेने प्रेरित आहे, जो समाजाच्या चेहऱ्यावर जोरदार चपराक लगावतो.

काय आहे चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा काही सामान्य घरांपासून सुरू होते. मग, काही स्त्रिया कोर्टाबाहेर तोंड झाकून धावताना दिसतात. एसीपी अभय (इंद्रनील सेनगुप्ता) त्यावेळी कोर्टात दाखल होतो. कोर्टरूममध्ये अभय रक्ताने माखलेल्या एका माणसाला भेटतो, ज्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याच्या अंगावर इतके वार झाले आहेत की जणू कोणीतरी कित्येक वर्षांपासून बदला घेण्याच्या शोधात बसले होते आणि संधी मिळताच त्याने आपले काम फत्ते केले आहे.

या महिला कोण होत्या, या प्रश्नाचे उत्तर निरीक्षक पाटील नागपूरच्या राही बस्तीला पोहोचतात तेव्हा उघड होते. सर्व महिलांना येथे बोलवल्यानंतर पोलीस फक्त पाच महिलांना सोबत घेऊन जातात. आता आशाची (रिंकू राजगुरू) एन्ट्री होते. तथापि, प्रत्येकजण तिला पोलिसांसमोर न जाण्याची सूचना देतो, जेणेकरून तिला महिलांना तुरुंगातून बाहेर काढण्याची कल्पना शोधता येईल. चित्रपटात जे काही घडते त्यामध्ये आशा मोठी भूमिका बजावते. आता महिला तुरुंगात गेल्या आहेत, पण हत्या कोणी केली?  हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. बल्ली चौधरी (साहिल खट्टर) याची हत्या झाली. तोच बल्ली चौधरी जो उच्च जातीचा आहे आणि राजकारण्यांच्या घरातील आहे. बल्ली चौधरी हा या दलित बस्तीचा गुंड आहे.

या हत्येचे गूढ उकलण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या पौर्णिमा (प्लोरा सैनी) यांनी एक समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये चार सदस्य आहेत. सेवानिवृत्त न्यायाधीश विठ्ठल (अमोल पालेकर) यांना समितीचे प्रमुख म्हणून बोलावण्यात आले आहे, जे स्वतः दलित समाजातून असतात. मात्र, या हत्येच्या तपासादरम्यान ते आपली जात अडथळा येऊ देत नाही. जेव्हा खटला सुरू होतो, तेव्हा कनिष्ठ न्यायालयाने अटक केलेल्या पाच महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. पण न्यायमूर्ती विठ्ठलाच्या मनात एक गोष्ट सतत येत राहते की, या महिलांनी बल्ली चौधरींना का मारले?

सुधा ताई, या त्या महिलांपैकी एक आहेत ज्या सध्या शिक्षा भोगत आहेत. त्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांच्याकडून सत्य जाणून घेतल्यावर न्यायमूर्ती विठ्ठल यांच्या पायाखालची जमीन सरकते. यानंतर, ते या महिलांवरील खटला वरच्या न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतात. न्यायमूर्ती विठ्ठल हे प्रकरण जिंकतात की नाही? आणि या महिलांनी बल्ली चौधरींना का मारले, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. समाजातीत वास्तव जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा जरूर पहावा.

कसा आहे कलाकारांचा अभिनय?

चित्रपटाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती त्याच्या पात्राला न्याय देताना दिसतो. मग तो चहाच्या टपरीवर उपस्थित चहावाला असो किंवा महिलांविरुद्ध साक्ष देणारी व्यक्ती असो. प्रत्येकाने उत्तम अभिनय केला आहे. अमोल पालेकरांनी अनेक वर्षानंतर पुनरागमन केले आहे. अमोल पालेकर यांचे संवाद चित्रपट अधिक मनोरंजक बनवतात. दुसरीकडे, रिंकू राजगुरूने तिचे पात्र इतके सशक्तपणे साकारले आहे की, जणू काही चित्रपटात नव्हे तर वास्तवात ही घटना घडत आहे. या व्यतिरिक्त, वरुण सोबती वकिलाच्या भूमिकेत चपखल बसला आहे. बल्ली चौधरीची भूमिका साकारणाऱ्या साहिल खट्टरने उत्तम अभिनय केला आहे.

कसा आहे चित्रपट?

एकूण चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट त्याच्या कथेला न्याय देण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट खऱ्या घटनांनी प्रेरित आहे, ज्यामुळे तो पाहतानाही खरा वाटतो. चित्रपट तसा मोठा आहे, पण तो तुम्हाला जागी खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात फक्त एकच गाणे आहे. चित्रपटात जातीवादाचा मुद्दा खूप छान मांडला आहे. दलित स्त्रिया वर्षानुवर्षे अन्याय का सहन करतात, ते सुद्धा खूप भेदक पद्धतीने मांडले आहे. त्याचबरोबर कायद्याचा खरा चेहरा दाखवला आहे. कायदा सर्वांसाठी एक आहे असे म्हटले जाते, मात्र हे केवळ उच्चवर्णीयांसाठीच असल्याचे दाखवले गेले आहे.

हेही वाचा :

Shershaah Full Review : कारगिलमध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राच्या शौर्याची कथा, वाचा कसा आहे ‘शेरशाह’ चित्रपट

Bhuj Short Review | अजय देवगणचा बहुप्रतीक्षित ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.