AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaj Tripathi | पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांनी घेतला अखेरचा श्वास

पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अखेरच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. त्यांचं गाव बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून आई-वडील बेलसंड नावाच्या गावी राहायचे.

Pankaj Tripathi | पंकज त्रिपाठी यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांनी घेतला अखेरचा श्वास
Pankaj TripathiImage Credit source: Twitter
| Updated on: Aug 21, 2023 | 3:18 PM
Share

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : ‘ओह माय गॉड 2’ या चित्रपटाच्या यशामुळे सध्या चर्चेत असलेले अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अखेरच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत नव्हते. त्यांचं गाव बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून आई-वडील बेलसंड नावाच्या गावी राहायचे. पंकज त्रिपाठी हे याच गावी लहानाचे मोठे झाले. बेलसंड गावी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच पंकज त्रिपाठी त्यांच्या गावी रवाना झाले आहेत.

पंकज त्रिपाठी यांची वडिलांशी फार जवळीक होती. ते मुंबईत कामासाठी स्थायिक झाले असले तरी आईवडिलांची भेट घेण्यासाठी ते सतत गावी जायचे. गावी गेल्यावर ते आवर्जून वडिलांसोबत वेळ घालवायचे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्येही ते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाबद्दल व्यक्त व्हायचे. “जर माझ्या पालकांनी माझ्या निर्णयांचा आदर केला नसता तर आज मी इथे नसतो”, असं ते नेहमी म्हणतात.

“माझे वडील इतके भोळे आहेत की त्यांना थिएटर आणि अभिनय याविषयी काहीच माहीत नाही. मी जेव्हा मुंबईत स्थायिक झालो आणि माझे वडील मला भेटायला इथे आले, तेव्हा उंच-उंच इमारती आणि गर्दी पाहून ते घाबरले. त्यांना इथलं राहणीमान अजिबात आवडलं नव्हतं. मुंबईहून गावी गेल्यानंतर ते पुन्हा कधीच इथे परतले नाहीत”, असं पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

पंकज त्रिपाठी यांचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे पंकज त्रिपाठी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.