AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे पहिजे नाही तर… ‘या’ मराठी सिनेमातील सीन तुफान व्हायरल

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकीय मनोमिलन होणार का? चर्चा सुरु असताना मराठी सिनेमातील 'तो' सीन होतोय तुफान व्हायरल, कोणता आहे 'तो' सिनेमा?

महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे पहिजे नाही तर... 'या' मराठी सिनेमातील सीन तुफान व्हायरल
| Updated on: Apr 21, 2025 | 1:31 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं राजकीय मनोमिलन होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी एकत्र यायलाच हवं असं अनेकांना वाटत आहे. दोघे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकतं, असं अनेकांना वाटतं. दरम्यान राज ठाकरे यांनी दिलेल्या एका मुलखतीनंतर दोन्ही ठाकरे एकत्र येतील.. याच प्रतीक्षेत देखील महाराष्ट्राची जनता आहे.

“महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, आमच्यातील वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं, राहणं, यात कोणतीही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण याठिकाणी विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरे एका मुलाखतीत म्हणले.

राज ठाकरे यांच्या वक्तव्यनंतर उद्धव ठाकरे यांनी देखील एकत्र येण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. पण यामध्ये हित फक्त महाराष्ट्राचं असेल… अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली. यानंतर सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. एवढंच नाही तर, मराठी सिनेमातील एक सीन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देखील दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर ज्या सिनेमाचा एक सीन व्हायरल होत आहे, त्या सिनेमाचं नाव राज का ‘रण’ असं आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा महाराष्ट्राच्या राजकारणातील या महत्त्वाच्या घटनेवर आधारित होता. सिनेमात राज ठाकरे यांची भूमिका अभिनेते प्रसाद ओक आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका दीपक करंजीकर यांनी साकारली होती.

सिनेमात एक सीन आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सीनमध्ये वेगळे झालेले भाऊ एकाच मंचावर येतात. सीनमध्ये मंच हलताना दिसत आहे. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील हलताना दिसत आहे. महाराजांचा पुतळा हलताना पाहून दोन्ही भाऊ एकत्र येतात… त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राच्या हितासाठी देखील दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं आहे… असं अनेकांचं म्हणणं आहे.

व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘सर्वांची हीच इच्छा आहे … महाराष्ट्राला तुम्ही एकत्र असण्याची गरज आहे नाहीतर काहीच होऊ शकत नाही..’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दोघी बंधूं एकत्र येणं कठीणच आहे , पण दोघींनी सगळ बाजूला सारून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला हवे…’, अन्य एक नेटकरी म्हणाला ‘दोघांनी एकत्र येणं काळाची गरज…’ सध्या सोशल मीडियावर सिनेमातील सीन तुफान व्हायरल होत आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.