AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rekha | ब्रेकअपच्या बऱ्याच वर्षांनंतर रेखाबद्दल किरण कुमार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..

रेखा यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत होतं. बॉलिवूडमधल्या बऱ्याच सेलिब्रिटींसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक नाव म्हणजे किरण कुमार. किरण कुमार आणि रेखा हे 1970 च्या दशकात एकमेकांना डेट करत होते. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही.

Rekha | ब्रेकअपच्या बऱ्याच वर्षांनंतर रेखाबद्दल किरण कुमार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Rekha and Kiran KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 13, 2023 | 9:15 AM
Share

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडच्या ‘एव्हरग्रीन’ अभिनेत्री रेखा यांचं बऱ्याच अभिनेत्यांसोबत नाव जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक नाव म्हणजे किरण कुमार. 1970 च्या दशकात रेखा आणि किरण कुमार यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नव्हतं. किरण कुमार यांनी पुन्हा रेखा यांच्यासोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते रेखाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “वैयक्तिकदृष्ट्या फक्त रेखाचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव होता असं मी म्हणणार नाही. पण माझ्या आयुष्यात ज्या कोणी महिला आल्या, त्या प्रत्येकीने मला पुढे जाण्यात खूप मदत केली.”

‘मम्माज बॉय’ कमेंटवर प्रतिक्रिया

1995 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी किरण यांना ‘मम्माज बॉय’ असं म्हटलं होतं. याविषयी किरण यांची प्रतिक्रिया विचारली असता ते पुढे म्हणाले, “रेखाजी खूप प्रेमळ आहेत. त्यांचं हृदय सोन्याचं आहे आणि चेहरा सौंदर्यवतीचा आहे. इतक्या वर्षांनंतर आजही त्या इतक्या सुंदर कशा दिसू शकतात हा मला प्रश्न पडतो. ती एक अशी व्यक्ती आहे, जिच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे. बऱ्याच काळापासून आमची भेट झाली नाही. पण त्या व्यक्तीला मी माझ्या हृदयात कायम जपून ठेवीन. बस, इतकंच.”

रेखा यांच्याविषयी काय म्हणाले?

रेखा यांनी एक व्यक्ती म्हणून विकसित होण्यास कशी मदत केली असा प्रश्न किरण यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं, “माझा विकास करण्यास कोणीही मदत केली नाही. मी स्वत:च माझ्या प्रगतीसाठी जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक महिलेनं मला एक व्यकी म्हणून घडण्यास मदत केली. फक्त एका विशेष व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही. कारण त्या सर्वांनीच माझी मदत केली. माझं यश हे माझंच आहे आणि माझं अपयशसुद्धा माझं स्वत:चं आहे. त्याचं श्रेय मी कोणाला देणार नाही.”

“रेखाचं हृदय सोन्याचं”

या मुलाखतीत किरण यांनी हेसुद्धा सांगितलं की जर त्यांना संधी मिळाली तर ते रेखा यांच्याशी नक्कीच संवाद साधतील. “मला त्यांना संपर्क करायचा नाही. मी त्यांना फोन करून हे सांगू इच्छित नाही की, मॅडम मला तुम्हाला भेटायचं आहे. मी असं करू शकत नाही. कारण त्यांचं स्वत: एक आयुष्य आहे आणि माझंही आहे. जर नशिबात असेल तर आम्ही भेटू आणि तेव्हा मित्रांप्रमाणे गप्पा मारू. त्यांचं हृदय सोन्याचं आहे.”

1975 मध्ये ‘स्टारडस्ट’ या मासिकेला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दलही किरण यांना प्रश्न विचारला गेला. रेखा फोनवर बोलताना किरण यांच्या एक्स-गर्लफ्रेंडची नक्कल करून दाखवायच्या आणि त्यामुळे ते खूप चिडायचे, असं त्यात म्हटलं गेलं होतं. याविषयी बोलताना किरण म्हणाले, “असं काहीच झालं नव्हतं. ती खूप मोठी व्यक्ती आहे. ती असं का करेल? ती कोणाचंच अपमान करणार नाही. रेखा यांनी असं कधीच केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. ती एक्स गर्लफ्रेंड कोण होती, हेसुद्धा मला माहीत नाही.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.