AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर हे खूप कडक स्वभावाचे होते याची सर्वांनाच कल्पना आहे. एकदा रागात सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरला जोरदार कानशिलात लगावली होती. रणबीरने स्वत: हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे.

लेकाची कृती पाहून संताप; ऋषि कपूर यांनी रणबीरला सर्वांसमोर जोरदार कानशिलात का लगावली होती?
Rishi Kapoor slapped Ranbir Kapoor hardImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2025 | 6:37 PM
Share

बॉलिवूडमध्ये घराणेशाही म्हटलं की सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे कपूर कुटुंबाचं. त्यात कपूर कुटुंबातील अभिनेते ऋषी कपूर हे कायम चर्चेत असायचे ते त्यांच्या कडक स्वभावामुळे. त्यांचे ट्वीट असतील किंवा मग त्याचे कौटुंबिक वाद असतील. त्यांचे किस्से हे नेहमीच चर्चेत असायचे. ऋषी कपूर यांना पटकन राग यायचा असंही बऱ्याचदा म्हटलं जायचं.

ऋषी कपूर यांनी रणबीरला कानशिलात का लगावली होती? 

पण त्यांनी याच रागात मुलगा रणबीर कपूरला जोरदार कानशिलात लगावली होती. रणबीरने अशी काहीतरी कृती केली होती की ती त्यांना सहन झाली नाही. म्हणून त्यांनी रणबीरला मारलं होतं. रणबीरने स्वत: हा किस्सा सांगितला आहे.

काही कौटुंबीक वादाचे प्रसंग सोडले तर रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्याशी खूप चांगले संबंध होते असं म्हटलं जायचं. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आणि किस्से आजही चर्चेत असतात. असाच एक किस्सा जो रणबीरने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. खरं तर एकदा रणबीर बूट घालून देवघरात आला तेव्हा ऋषी कपूर यांना प्रचंड राग आला होता.

रणबीरची ही कृती ऋषी कपूर यांना अजिबात आवडली नव्हती 

एका मुलाखतीदरम्यान रणबीरने हा प्रसंग सांगितला. तो म्हणाला, “मी नेहमीच माझ्या वडिलांचा चाहता राहिलो आहे. मला त्यांचे वेगवेगळे पात्र पहायला आवडतं. जरी माझे वडील कधीही माझ्यावर ओरडले नाहीत,तरी त्यांनी मी लहान असताना एकदा मला खूप जोरात कानशिलात लगावली होती. कारण मी पुजाघरात थेट बूट घालून गेलो होतो. तेव्हा मी सुमारे 12 वर्षांचा होतो.” त्यामुळे ऋषी संतापले आणि त्यांनी राग काढताना रणबीरवर हार उगारला. दरम्यान वडिलांच्या अशा अनेक आठवणी आहेत ज्याबद्दल रणबीर नेहमीच सांगत असतो.

रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास…

आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत रणबीरने ‘बर्फी’, ‘संजू’, ‘ए दिल है मुश्किल’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘तू झुठी में मक्कर’, ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन’, ‘ॲनिमल’, रॉकस्टार, आणि ‘राजनीती’ सारखे अनेक हीट चित्रपट दिले आहेत. आता रणबीर 1 हजार कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनत असलेल्या ‘रामायण’ चित्रपटात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची तेवढीच उत्सुकता आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.