AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित असतानाही सलमान खानच्या वडिलांनी हेलनशी का केलं दुसरं लग्न? अखेर सोडलं मौन

सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी 18 नोव्हेंबर 1964 रोजी सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही सलीम यांचं अभिनेत्री हेलनशी अफेअर सुरू होतं.

विवाहित असतानाही सलमान खानच्या वडिलांनी हेलनशी का केलं दुसरं लग्न? अखेर सोडलं मौन
Salim and Salman KhanImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 03, 2023 | 1:02 PM
Share

मुंबई: बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानचा नवीन शो ‘द इन्विसिबल विथ अरबाज खान’ सध्या चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अरबाजचे वडील सलीम खान हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

सलीम खान यांनी मुलासमोर त्यांच्या दोन लग्नाविषयीही मोकळेपणे भाष्य केलं. सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी 18 नोव्हेंबर 1964 रोजी सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही सलीम यांचं अभिनेत्री हेलनशी अफेअर सुरू होतं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हेलनशी दुसरं लग्न केलं. विवाहित असताना दुसरं लग्न का केलं, याविषयी अखेर सलीम खान यांनी मौन सोडलं आहे.

हेलन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अरबाजने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सलीम खान म्हणाले, “ती तरुण होती, मीसुद्धा तरूण होतो. माझा काही चुकीचा उद्देश नव्हता. मी तिच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक प्रसंग होता, जे कोणासोबतही घडलं असतं.”

वडिलांचं ऐकल्यानंतर अरबाजने स्वत:चाही अनुभव सांगितला. “या त्याच गोष्टी आहेत ज्यामुळे मी वडिलांवर नाराज होऊ शकलो असतो. ते आता माझ्या आयुष्यात घडतंय. कोणत्याही गोष्टीला समजण्यासाठी वेळ हा खूप मोठा फॅक्टर असतो”, असं अरबाज म्हणाला.

1980 च्या दशकात सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलीम खान यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांचं हेलनसोबतचं नातं सर्वांनीच स्वीकारलं नव्हतं. सलीम आणि हेलन यांनी अर्पिला खानला दत्तक घेतलं होतं. तर पहिल्या लग्नातून सलीम यांना चार मुलं आहेत. सलमान, अरबाज, सोहैल आणि अलविरा ही त्यांची चार मुलं आहेत.

या शोमध्ये सलीम खान यांनी सलमासोबतच्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला. “आम्ही आधी लपूनछपून एकमेकांशी भेटायचो. मी सलमाला जेव्हा सांगितलं की मला त्यांच्या कुटुंबीयांशी भेटायचं आहे, तेव्हा सर्वजण मला बघण्यासाठी आले होते. जणू एखाद्या प्राणीसंग्रहालयात नवी प्राणी आला असावा, त्या पद्धतीने ते मला बघत होते”, अशा शब्दांत त्यांनी मजेशीर किस्सा सांगितला.

या टीझरमध्ये अरबाज आणखी एका प्रसंगाविषयी बोलताना दिसतो. “ज्यावेळी तुम्ही विभक्त झालात, तेव्हा मला आठवतंय की माझा अपघात झाला होता. त्यावेळी तुम्ही हेलन आंटीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचा स्वीकार करणं हा मोठा मुद्दा होता. पण त्याचवेळी तुमच्या हातात कोणतंही काम नव्हतं. या सर्व प्रसंगांवर तुम्ही कशी मात केली”, असं अरबाज विचारतो. याचं उत्तर आता प्रेक्षकांना या शोच्या एपिसोडमध्येच ऐकायला मिळेल.

अरबाजच्या या नव्या शोमध्ये जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहमान, हेलन हेसुद्धा पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. अरबाजचा हा शो दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.