लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असतानाही सलमान खानने घेतला मोठा निर्णय

Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर ही तो बाहेर पडत होता. पण बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तो आणखी सतर्क झाला आहे. सलमान खानचं कुटुंब यामुळे चिंतेत आहे. पण असं असताना ही सलमान खानने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाली असतानाही सलमान खानने घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 5:11 PM

मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली होती. 12 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला होता. बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मित्र होते. त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. कोणी सलमान खानशी संबंध ठेवेल तर त्यालाही असेच भोगावे लागेल अशी धमकी ही देण्यात आली होती. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, या सगळ्यामध्ये अभिनेता सलमान खानने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सलमान खान सध्या बिग बॉस 18 हा रिॲलिटी शो होस्ट करण्यात तसेच एआर मुरुगदास दिग्दर्शित सिकंदर या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रविवारी बाब सिद्दिकी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्याने सर्व शूट रद्द केले होते, त्यानंतर ही तो शूटिंग करणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण त्याला धमकी मिळाली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शूटिंग रद्द केल्याची बातमी खरी नसल्याचे म्हटले आहे. अभिनेत्याची सुरक्षा सेटवर कडक करण्यात आली आहे. सलमान खान याच्या आसपास नेहमीच सुरक्षा होती, परंतु आता आणखी 8 ते 10 सुरक्षा रक्षक जोडले गेले आहेत. सलमान खान येण्याआधी ते आधी रेकीसाठी येतात.

सलमान खानने शुटिंग शेड्यूल 1-2 दिवसांनी पुढे ढकलले होते. परंतु त्याचा काही खास परिणाम होणार नाही. शूटिंग नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये संपेल असे अपेक्षित होते. आता ते जानेवारीपर्यंत जाईल. कारण सध्या सर्वांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. मुरुगादास यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे शूटिंग पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. मुंबईतील एसआरपीएफ मैदानावर पुढील शुटिंग होणार आहे. सलमान खानच्या सुरक्षेचा विचार करून शूटिंगचे लोकेशन गुप्त ठेवण्यात येणार आहे. प्रोडक्शन टीमलाच याबाबत माहिती दिली जाणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, “आधी हैदराबादमध्ये हे शूट होणार होते. पण आता मुंबईत सर्व शुट होणार असल्याचे बोलले जात आहे.

Non Stop LIVE Update
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान
नागपूरात कॉंग्रेसचा सांगली पॅर्टन?, कॉंग्रेस-राष्ट्रवादीत घमासान.
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध
हेचि फल काय मम तपाला,पडळकर यांना स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध.
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील
देवेंद्र फडणवीस यांनी तोंडचा घास हिरावला - मनोज जरांगे पाटील.
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.