Seema Haider | अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, तर…? सीमा हैदरने राष्ट्रपतींकडे मागितली दाद

सीमा हैदर हिला मिळू शकतं भारताचं नागरिकत्व? अदनान सामी यांचा दाखला देत सीमा हिने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली मागणी

Seema Haider | अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं, तर...? सीमा हैदरने राष्ट्रपतींकडे मागितली दाद
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 1:45 PM

मुंबई | 23 जुलै 2023 : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या प्रेम प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नेपाळ येथून भारतात घुसखोरी करणारी सीमा हैदर आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर हिला आता भारताचं नागरिकत्व हवं आहे. यासाठी सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दाद देखील मागितली आहे. सीमा हिच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी राष्ट्रपती भवनाकडे याचिका दाखल केली. सीमाने भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामी यांचा हवाला दिला आहे.

‘मी सीमा हैदर नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीणा याच्यावर प्रेम करते आणि मला त्याच्यासोबत राहायचं आहे…’ असं याचिकेत म्हटलं आहे. रिपोर्टनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे विनंती केली आहे की, जर तिला माफी मिळणार असेल तर, सीमा पती सचिन याच्यासोबत भारतात राहू शकते.

एवढंच नाही तर, यावेळी सीमा हिने गायक अदनान सामी यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केल्याचं समोर येत आहे. जर भारतात बराच काळ राहिल्यानंतर प्रसिद्ध गायक अदनान सामी यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं तर, सीमाला देखील भारताचं नागरिकत्व मिळायला हवं.. भारतात राहण्याची परवानगी मिळाल्यानंतर मी सन्मानाने भारतात राहू शकते… असं देखील सीमा म्हणाली आहे.

हे सुद्धा वाचा

महत्वाची गोष्ट सीमा हिने दाखल केलेल्या याचिकेत सरकारी आकड्यांचा देखील दाखला देण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेश येथील ४ हजार नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्यात आलं आहे. सीमाच्या वतीने वकील एपी सिंह यांनी याचिकेत सांगितले की, सीमा तपासात सर्व यंत्रणांना सहकार्य करत आहे. ‘पाकिस्तानी गुप्तहेर’च्या आरोपावरून ती लाय डिटेक्टर चाचणी देण्यासही तयार आहे. असं देखील सांगण्यात येत आहे.

सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली की जर तिला भारतीय नागरिकत्व मिळाले तर ती पती, सासू आणि सासरे यांच्यासोबत राहू शकेल. एवढंच नाही तर, सीमा फारशी शिक्षित नाही असं देखील वकील एपी सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे. सध्या सीमा एटीएसच्या निशाण्यावर आहे. सर्वत्र सीमा हैदर प्रकरणाने खळबळ माजली आहे.

अदनान सामी यांना मिळालं भारताचं नागरिकत्व..

पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामी यांना २०१६ मध्ये भारताचं नागरिकत्व देण्यात आलं. नागरिकत्व प्रक्रियेतून जाण्यासाठी अदनान यांना ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्याची आठवण करवून देताना गायक म्हणाले, “पण मी कधीही आशा सोडली नाही, मी कधीही हार मानली नाही.” अदनान यांनी सांगितले होते की, यासाठी त्यांना १६ वर्षे वाट पाहावी लागली होती.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.