AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahid Kapoor | ‘८ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर…’, शाहिद कपूरकडून वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

'मीरा प्रचंड कठोर आहे, ज्यामुळे...', लग्नाला आठ वर्ष झाल्यानंतर पत्नीबद्दल असं का म्हणाला शाहिद कपूर? सर्वत्र अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा...

Shahid Kapoor | '८ वर्षांच्या संघर्षानंतर अखेर...', शाहिद कपूरकडून वैवाहिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा
| Updated on: Jun 04, 2023 | 1:01 PM
Share

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि पत्नी मीरा राजपूत (Mira rajput) कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघांची जोडी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी एक आहे. एवढंच नाही तर, दोघे एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना देखील दिसतात. शाहिद आणि मीरा यांच्या लग्नाला जवळपास ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही दोघे पती-पत्नीच्या नात्यामध्ये एकमेकांचा आदर करतात. शाहिद कायम अनेक मुलाखतींमध्ये मीरा आणि त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगत असतो. आता देखील लग्नाच्या आठ वर्षांनंतर शाहिदने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल मोठं रहस्य चाहत्यांना सांगितलं आहे. शिवाय मुलांबद्दल देखील अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र शाहिद आणि अभिनेत्याच्या वैवाहिक आयुष्याची चर्चा रंगत आहे..

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने लग्नानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. शिवाय पत्नी मीरा हिच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल देखील अभिनेत्याने मौन सोडलं आहे. ‘दिवसागणिक मीरावर असलेलं माझं प्रेम वाढत आहे…’ असं अभिनेता म्हणाला. शिवाय मीरा आयुष्यात आल्यामुळे संपूर्ण आयुष्य बदललं आहे… असं देखील अभिनेता मुलाखतीत म्हणाला…

वैवाहिक आयुष्याबद्दल शाहिद म्हणाला की, मी आता एक गोष्टीचा स्वीकार केला आहे आणि ती गोष्ट म्हणजे, लग्नानंतर तुमचा दृष्टीकोण कायम योग्य नसतो. आपल्याकडून चुका झाल्या आहेत आणि तुम्हाला गोष्टी बदलायच्या आहेत.. लग्न माणसाला जाणीव करून देतं की तो सामान्य आहे.. असं शाहिद लग्नाबद्दल म्हणाला…

‘लग्नानंतर सुरुवातीला काही गोष्टींसाठी मी मीराला नाही म्हणायचो.. पण आता काही बोलू शकत नाही… होकारच द्यावा लागतो.. लग्नाच्या आठ वर्षांच्या संघर्षानंतर मला कळाल आहे, जी लढाई तुम्ही जिंकू शकत नाही.. ती लढाई न लढलेलीच बरी… कारण पत्नी कायम योग्यच असते…’ असं देखील विनोदी अंदाजात अभिनेता म्हणाला..

पुढे अभिनेता म्हणाला, ‘जोडीदाराचा दृष्टीकोन नेहमीच योग्य नसतो, परंतु अनेक यशस्वी पुरुषांना हे सत्य स्वीकारण्यास त्रास होतो. त्यांना वाटतं की ते नेहमीच बरोबर असतात, परंतु हे सत्य नाही. मीराची एक गोष्ट प्रचंड चांगली आहे आणि ती म्हणजे तिला काय करायचं हे माहिती असतं… कपल म्हणून दोघांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करायला हवा..

मीरा कायम प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते.. मुलांसाठी ती प्रचंड कठोर आहे, कारण तिला माहिती आहे त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी योग्य आहेत. शाहिद कायम त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. शिवाय आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत असतो..

नुकताच अभिनेता शाहिद कपूर वेब सीरिज फर्जीमध्ये दिसला होता. यानंतर तो लवकरच ‘ब्लडी डॅडी’ सिनेमाच्या माध्यमाातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाच अभिनेता थ्रिलर स्टाईलमध्ये दिसणार आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.