AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत केलं लग्न, आज 2 नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे अभिनेता

50 सिनेमांमध्ये केलं काम, पण नाही मिळाली प्रसिद्धी आणि लोकप्रियता, अखेर माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत केलं लग्न, आज 2 नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे अभिनेता... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा... कोण आहे 'तो'?

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत केलं लग्न, आज 2 नामवंत  रेस्टॉरंटचा मालक आहे अभिनेता
| Updated on: May 24, 2024 | 10:48 AM
Share

भारतीय सिनेविश्वात असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना काम तर मिळालं पण प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. सेलिब्रिटी फक्त एका हीटच्या प्रतीक्षेत राहिले. पण यशाच्या शिखरावर पोहोचणं त्यांच्यासाठी कठीण होतं. एवढंच नाहीतर, सहाय्यक कलाकार म्हणून काम केल्यानंतर काही सेलिब्रिटींना प्रसिद्धी मिळाली नाही. सध्या आपण अशा अभिनेत्याबद्दल बोलत आहोत, ज्याने 50 सिनेमांमध्ये काम केलं पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. रुपेरी पडद्यावर सर्व प्रयत्न करुन देखील अभिनेता यशाच्या शिखरावर पोहोचला नाही. अशात अभिनेत्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीसोबत लग्न केलं आणि आज अभिनेता 2 नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे.

1996 मध्ये दिग्दर्शक महेश भट्ट दिग्दर्शित ‘दस्तक’ या सिनेमातून दोन कलाकारांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात अभिनेत्री सुष्मिता सेनने मुख्य भूमिका साकारली होती, तर अभिनेता शरद कपूरने खलनायकाची भूमिका केली होती. सुष्मिता आणि शरद या दोघांसाठी हा पहिलाच सिनेमा होता. ‘दस्तक’ सिनेमानंतर सुष्मिता यशाच्या शिखरावर पोहोचली. शरदच्या वाट्याला मात्र अपयश आलं.

शरदबद्दल सांगायचं झालंतर, झगमगत्या विश्वात त्याचा कोणी गॉडफादर नव्हता. अशात अभिनेता स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मायानगरी मुंबईत आला. मुंबईत येण्यासाठी अभिनेत्या कुटुंबियांना देखील अनेकदा समजावलं. 1993 मध्ये अभिनेता मुंबईत आला आणि त्याचा संघर्ष सुरु झालाय जवळपास 6 महिने अभिनेता मुंबईच्या रस्त्यांवर झोपला होता.

अनेक निराशेनंतर अखेर शरद कपूरला ‘स्वाभिमान’ या मालिकेत छोट्या भूमिकेची ऑफर आली. त्यानंतर महेश भट्ट यांनी त्याची दखल घेतली आणि शरद कपूरला ‘दस्तक’मध्ये सुष्मिता सेनसोबत मुख्य भूमिकेची ऑफर दिली. त्यानंतर शरदने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अभिनेत्याने सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम केलं.

अनेक सिनेमांमध्ये काम करून देखील अभिनेत्याला यश मिळालं नाही. शरद कपूरने अनेक फ्लॉप सिनेमे दिले असले तरी, अभिनेता ‘जय हो’ ‘तमन्ना’, ‘लक्ष्य’ आणि ‘जोश’ यांसारख्या सिनेमामुळे चर्चेत आहे. शिवाय हटके आणि डॅशिंग बॉडीमुळे देखील अभिनेता चर्चेत राहिला.

शरद कपूर त्याच्या पर्सनल आयुष्यापेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. जेव्हा अभिनेत्याच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा चाहते देखील थक्क झाले. शरदने माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची नात कोयल बसू हिच्यासोबत लग्न केलं. 2008 मध्ये शरद आणि कोयल यांचं लग्न झाले. आता अभिनेता खासगी आयुष्यात आनंदी आहे.

शरद फक्त अभिनेता नाहीतर, उद्योजक देखील आहे. शेखर कपूर दोन नामवंत रेस्टॉरंटचा मालक आहे मुंबई आणि बंगलोर याठिकाणी अभिनेत्याचे रेस्टॉरंट आहे. अभिनेता आता झगमगत्या विश्वापासून दूर आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.