AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्या निकाहनामाने क्रिकेटशी संबंधित चर्चेवरच घातली बंदी; शर्मिला टागोर यांचा खुलासा

अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नाची त्याकाळी जोरदार चर्चा होती. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील हे सर्वाधिक चर्चेतलं कपल होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांच्या निकाहनाम्याविषयी खुलासा केला.

माझ्या निकाहनामाने क्रिकेटशी संबंधित चर्चेवरच घातली बंदी; शर्मिला टागोर यांचा खुलासा
Sharmila Tagore and Tiger PataudiImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2024 | 4:38 PM
Share

सध्याच्या घडीला देशभरात क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जितकी क्रेझ आहे, तितकीच क्रेझ एकेकाळी अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटर टायगर पतौडी यांच्याविषयी होती. दोघंही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील होते आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी चांगलं यश कमावलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला याविषयी व्यक्त झाल्या. माझ्या ‘निकाहनामा’मध्ये क्रिकेटशी संबंधित सर्व चर्चेतून मला बंदी घालण्यात आली होती, असं त्यांनी गंमतीत सांगितलं. शर्मिला यांना क्रिकेटविषयी फारसं काही समजायचं नाही. वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत त्या याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

“फिल्म इंडस्ट्री ही सातत्याने बदलतेय आणि कमी बजेटच्या चित्रपटांचं कथानक चांगलं असेल तरी त्याकडे प्रेक्षकवर्ग खेचला जाऊ शकतो”, असं शर्मिला म्हणतात. चित्रपटांविषयी बोलत असताना कपिल सिब्बल त्याची तुलना क्रिकेटविश्वाशी करू लागतात. आयपीएल आणि फिल्म इंडस्ट्रीतील समानतेविषयी ते बोलत असताना शर्मिला हसून म्हणतात, “मला वाटत नाही की क्रिकेटबद्दल बोलण्यासाठी मी पात्र आहे. मी क्रिकेटविषयी कधीच काही चर्चा करणार नाही, असं माझ्या निकाहनामामध्ये लिहिलं होतं.”

शर्मिला यांनी दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं. “आमची भेट कोलकातामध्ये एका क्रिकेट पार्टीदरम्यान झाली होती. त्यावेळीच आम्ही एकमेकांचे टेलिफोन नंबर्स मागितले होते. टायगर पतौडी यांनी माझ्यासोबत एक प्रँक केला होता. तेव्हाच त्यांनी मला कॉफी प्यायला येशील का, असं विचारलं होतं. तिथूनच माझ्या संवादाची सुरुवात झाली”, असं त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सांगितलं होतं. टायगर पतौडी यांनी पॅरिसमध्ये शर्मिला यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. “आम्ही पॅरिसमध्ये होतो आणि त्यादिवशी तिथे सर्वजण रस्त्यावर स्वातंत्र्याचा दिवस साजरा करत होते. तेव्हाच एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे त्यांनी गुडघ्यावर बसून मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं”, असं त्यांनी सांगितलं. त्याकाळी या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. 27 डिसेंबर 1968 रोजी या दोघांनी लग्न केलं होतं. शर्मिला आणि टायगर यांना सैफ अली खान, सबा अली खान, सोहा अली खान ही तीन मुलं आहेत.

बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.