माझ्या निकाहनामाने क्रिकेटशी संबंधित चर्चेवरच घातली बंदी; शर्मिला टागोर यांचा खुलासा

अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर मन्सूर अली खान पतौडी यांच्या लग्नाची त्याकाळी जोरदार चर्चा होती. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील हे सर्वाधिक चर्चेतलं कपल होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला यांनी त्यांच्या निकाहनाम्याविषयी खुलासा केला.

माझ्या निकाहनामाने क्रिकेटशी संबंधित चर्चेवरच घातली बंदी; शर्मिला टागोर यांचा खुलासा
Sharmila Tagore and Tiger PataudiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 4:38 PM

सध्याच्या घडीला देशभरात क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जितकी क्रेझ आहे, तितकीच क्रेझ एकेकाळी अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटर टायगर पतौडी यांच्याविषयी होती. दोघंही पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील होते आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी चांगलं यश कमावलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला याविषयी व्यक्त झाल्या. माझ्या ‘निकाहनामा’मध्ये क्रिकेटशी संबंधित सर्व चर्चेतून मला बंदी घालण्यात आली होती, असं त्यांनी गंमतीत सांगितलं. शर्मिला यांना क्रिकेटविषयी फारसं काही समजायचं नाही. वकील आणि राजकारणी कपिल सिब्बल यांना दिलेल्या मुलाखतीत त्या याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

“फिल्म इंडस्ट्री ही सातत्याने बदलतेय आणि कमी बजेटच्या चित्रपटांचं कथानक चांगलं असेल तरी त्याकडे प्रेक्षकवर्ग खेचला जाऊ शकतो”, असं शर्मिला म्हणतात. चित्रपटांविषयी बोलत असताना कपिल सिब्बल त्याची तुलना क्रिकेटविश्वाशी करू लागतात. आयपीएल आणि फिल्म इंडस्ट्रीतील समानतेविषयी ते बोलत असताना शर्मिला हसून म्हणतात, “मला वाटत नाही की क्रिकेटबद्दल बोलण्यासाठी मी पात्र आहे. मी क्रिकेटविषयी कधीच काही चर्चा करणार नाही, असं माझ्या निकाहनामामध्ये लिहिलं होतं.”

हे सुद्धा वाचा

शर्मिला यांनी दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं. “आमची भेट कोलकातामध्ये एका क्रिकेट पार्टीदरम्यान झाली होती. त्यावेळीच आम्ही एकमेकांचे टेलिफोन नंबर्स मागितले होते. टायगर पतौडी यांनी माझ्यासोबत एक प्रँक केला होता. तेव्हाच त्यांनी मला कॉफी प्यायला येशील का, असं विचारलं होतं. तिथूनच माझ्या संवादाची सुरुवात झाली”, असं त्यांनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सांगितलं होतं. टायगर पतौडी यांनी पॅरिसमध्ये शर्मिला यांना लग्नासाठी प्रपोज केलं होतं. “आम्ही पॅरिसमध्ये होतो आणि त्यादिवशी तिथे सर्वजण रस्त्यावर स्वातंत्र्याचा दिवस साजरा करत होते. तेव्हाच एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे त्यांनी गुडघ्यावर बसून मला लग्नासाठी प्रपोज केलं होतं”, असं त्यांनी सांगितलं. त्याकाळी या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. 27 डिसेंबर 1968 रोजी या दोघांनी लग्न केलं होतं. शर्मिला आणि टायगर यांना सैफ अली खान, सबा अली खान, सोहा अली खान ही तीन मुलं आहेत.

Non Stop LIVE Update
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.