Shehnaaz Gill | “आओ और जाओ, दफा हो जाओ”; प्रेमात झालेल्या फसवणुकीनंतर शहनाजने व्यक्त केलं दु:ख

बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची जवळीक प्रेक्षकांना पहायला मिळाली. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र माध्यमांसमोर रिलेशनशिपची कबुली दोघांनी कधीच दिली नव्हती.

Shehnaaz Gill | आओ और जाओ, दफा हो जाओ; प्रेमात झालेल्या फसवणुकीनंतर शहनाजने व्यक्त केलं दु:ख
Shehnaaz Gill Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 2:30 PM

मुंबई : पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी जोडलं गेलं होतं. चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला ‘सिदनाज’ असं नाव दिलं होतं. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. काही महिने ती माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. सिद्धार्थच्या निधनाच्या दु:खातून सावरल्यानंतर शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज प्रेम आणि रिलेशनशिप यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. प्रेमात फसवणूक झाल्याचा खुलासादेखील तिने केला.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत शहनाजला विचारण्यात आलं की तिचा कधी प्रेमभंग झाला का? त्यावर ती म्हणाली, “मी आजपर्यंत प्रेमात कोणाची फसवणूक केली नाही. पण स्पष्ट बोलायचं झाल्यास, सर्वांनी माझी फसवणूक केली. समोरच्याच व्यक्तीने मला सोडलं. ज्यावेळी तुमच्या पार्टनरची नजर दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीवर असते, तेव्हा आपण एक पाऊल मागेच येतो. धोका दिल्यावर निघून जा.. आता मी हाच विचार करते की जर तुम्हाला यायचं असेल तर या, जायचं असेल तर जा. खड्ड्यात जा.”

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची जवळीक प्रेक्षकांना पहायला मिळाली. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र माध्यमांसमोर रिलेशनशिपची कबुली दोघांनी कधीच दिली नव्हती. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने सर्वांसमोर शहनाजला तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डान्सर आणि कोरिओग्राफर राघव जुयालसोबत शहनाजचं नाव जोडलं गेलं होतं.

अफेअरच्या चर्चांवर खुद्द राघवने उत्तर दिलं होतं. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला होता, “इंटरनेटवरील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत मी स्वत: ते पाहत नाही किंवा ऐकत नाही, तोपर्यंत ते खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही. मी इथे चित्रपटासाठी आलो आहे आणि मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. मी कामातून व्यक्त होतो. बाकी या सर्व गोष्टी (डेटिंगच्या चर्चा) असो किंवा नसो.. आणि हे सर्व शक्यच नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही.”

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.