AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nayanthara | लग्नानंतर नयनताराने अभिनय सोडण्याचा घेतला निर्णय? समोर आलं निर्णयामागील खरं कारण

नयनताराचा प्रतीक्षेत असलेला सर्वांत मोठा चित्रपट म्हणजे 'जवान'. यामध्ये ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. अटली याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Nayanthara | लग्नानंतर नयनताराने अभिनय सोडण्याचा घेतला निर्णय? समोर आलं निर्णयामागील खरं कारण
नयनतारा
| Updated on: Feb 24, 2023 | 9:29 AM
Share

चेन्नई : ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नयनतारा अभिनयविश्व सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. खासगी आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. नयनताराने प्रियकर विग्नेश शिवन याच्याशी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं होतं. लग्नानंतर चार महिन्यांनी या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. उयीर आणि उलगम अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत. आता या मुलांची देखभाल करण्यासाठी तिने करिअरमधून दोन पावलं मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनयातून ब्रेक घेऊन ती मुलांकडे आणि पतीच्या प्रॉडक्शन हाऊसकडे लक्ष देणार असल्याचं कळतंय. नयनताराचा पती विग्नेश शिवन हा दिग्दर्शकसुद्धा आहे आणि पत्नीसोबत मिळून त्याने ‘रावडी पिक्चर्स’ या निर्मिती कंपनीची स्थापना केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नयनताराचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिचा हा निर्णय ऐकून चाहते नाराज झाले आहेत. असं असलं तरी नयनताराचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. तिचे काही पूर्ण केलेले आणि शूटिंग झालेले चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नयनताराचा प्रतीक्षेत असलेला सर्वांत मोठा चित्रपट म्हणजे ‘जवान’. यामध्ये ती शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. अटली याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुख आणि नयनतारासोबतच विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि प्रियामणी यांच्याही भूमिका आहेत.

नयनताराच्या करिअरमधील 75 वा चित्रपट ‘लेडी सुपरस्टार 75’ याचीसुद्धा प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. निलेश कृष्णाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय पती विग्नेश शिवनने दिग्दर्शित केलेले आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यापैकी अल्फोन्से पुथरेन यांच्या ‘पाट्टू’ या चित्रपटात ती फहाद फासिलसोबत काम करणार आहे. तर AK 62 या चित्रपटात ती अजित कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तिने पुरी जगन्नाथ यांचा ‘ऑटो जानी’ हा चित्रपटसुद्धा साइन केल्याचं समजतंय. त्यामुळे एकानंतर एक असे काही तिचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

2015 मध्ये नयनतारा आणि विग्नेश यांची एका चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.