AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

(Aai kuthe kay karte) अनघा आणि अभिषेकमध्ये का झाला वाद? जाणून घ्या, मालिकेच्या आजच्या भागातील ट्विस्ट

'आपण बरं अन् आपलं काम बरं' अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?
Aai Kuthe Kay Karte
| Updated on: Feb 24, 2022 | 5:22 PM
Share

अनेक वर्षं गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबीयांसाठी, पतीसाठी झटत राहिलेली स्त्री जेव्हा स्वत:चं महत्त्व समजते आणि स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत असते, तेव्हा तिच्यासमोरचा मार्ग हा आणखी खडतर झालेला असतो. अशाच एका स्त्रीची कथा दाखवत आपल्या प्रत्येक एपिसोडमधून ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने असंख्य स्त्रियांना बळ देण्याचं काम केलं आहे. मालिकेत नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरुंधती (Arundhati) देशमुखांचं घर कायमस्वरुपी सोडून जाते. अरुंधतीची सून अनघा हिने नेहमीच तिची बाजू घेतली आहे. आई घरातून गेल्यानंतरही अभिषेकला काहीच फरक पडत नसल्याचं पाहून अनघाला मात्र राग अनावर होतो. कशाचीही पर्वा न करता अभिषेकसोबत हनिमूनला जाण्याचा पर्याय अनघासमोर असतो. मात्र ती अरुंधतीची बाजू खंबीरपणे मांडत नवऱ्याची कानउघडणी करते. (Marathi Serial Updates)

‘आपण बरं अन् आपलं काम बरं’

आई घर सोडून गेल्यानंतर अभिषेक त्याच्या हनिमूनचं प्लॅनिंग करत असतो. गोव्याची तिकिटंसुद्धा त्याने काढली असतात. मात्र आईसोबत घडलेल्या घटनेचा काडीमात्रही परिणाम मुलावर न झाल्याचं पाहून अनघा आश्चर्यचकित होते. “घरात काय परिस्थिती ते बघ. कोणाचाही मूड नाही आणि त्यात आपण कसं जाणार”, असा सवाल ती अभिषेकला करते. यावर अभिषेक तिला नेहमीसारखीच उत्तरं देतो. “यांची भांडणं चालू राहणार. त्यात आपण तरी काय करणार”, असं तो म्हणतो. हे ऐकून अनघा त्याची चांगलीच कानउघडणी करते. “आईच्या चारित्र्यावर संशय घेत असताना यश निदान कुणाची तरी बाजू घेत होता, त्याला जे वाटतं ते बोलत तरी होता. तू किमान गरज आहे तिथे तरी बोल. अशा स्वभावाला कातडीबचावपणा म्हणतात”, अशा शब्दांत ती अभिषेकला सुनावते. ‘आपण बरं अन् आपलं काम बरं, इतर लोकांमध्ये मला नाक खुपसायला नाही आवडत’, अशी उडवाउडवीची उत्तर अभिषेक तिला देतो.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

एकीकडे अरुंधती घर सोडून गेल्यानंतर आता अनघा आणि अभिषेकमधील वादामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनघाने नेहमीच तिची बाजू स्पष्टपणे मांडली आहे. अभिषेकचा स्वभाव मात्र तिच्याविरुद्ध आहे. अशात ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.