AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमधील हे महत्वाचे पात्र ही अभिनेत्री रिप्लेस करणार

टप्पू, मेहता साहब आणि अंजली भाभी यांच्या जागी इतर कलाकार रिप्लेस करण्यात आले. परंतू निर्मात्यांना अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतिक्षा कायम आहे.

अखेर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमधील हे महत्वाचे पात्र ही अभिनेत्री रिप्लेस करणार
| Updated on: Jan 13, 2023 | 3:28 PM
Share

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून सतत चाहत्यांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. घरातील प्रत्येक सदस्याची आवडती मालिका म्हणजे तारक मेहताच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील महत्वाचे कलाकार मालिकेला रामराम ठोकत आहेत. याचा परिणाम थेट TRP वर होताना दिसत आहे. मेहता साहब, टप्पू, दयाबेन आणि अंजली भाभी यांनी मालिका (Series) सोडल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. टप्पू, मेहता साहब आणि अंजली भाभी यांच्या जागी इतर कलाकार रिप्लेस करण्यात आले. परंतू निर्मात्यांना अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतिक्षा कायम आहे. मात्र, दयाबेन अर्थात दिशा वकानी कधी मालिकेमध्ये पदार्पण करणार हे स्पष्ट होऊ शकले नाहीये.

मालिकेमधील दुसरे एक महत्वाचे पात्र म्हणजे बाघाची बावरी ही देखील गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. मालिकेमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, बावरी सध्या तिच्या गावाकडे गेलीये. मात्र, जुन्या बावरीने देखील मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये.

आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी अत्यंत महत्वाची माहिती शेअर केलीये. आता मालिकेमध्ये लवकरच नवी बावरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tarak mehta

नवीना वाडेकर ही बावरीच्या भूमिकेत येणार आहे. मोनिका भदोरिया हिने अनेक वर्ष तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये बावरीचे पात्र साकारले. आता बावरीच्या भूमिकेमध्ये नवीना वाडेकर दिसणार आहे.

विशेष म्हणजे नव्या बावरीचे बाघासोबतचे काही फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत. नवीना वाडेकर हिचा लूक देखील जुन्या बावरीसारखाच दिसत आहे. अनेक कलाकारांनी मागील काही वर्षांमध्ये मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे.

सतत कलाकार मालिका सोडून जात असल्याने मालिकेच्या TRP वर मोठा परिणाम झालाय. नेहमी TRP मध्ये तारक मेहता ही मालिका पुढे असायची. मालिकेचे निर्माते अजून काही मोठे बदल करण्याची देखील दाट शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.