World Cup मधील टीम इंडियाच्या पराभवानंतर रडली अनुष्का; शाहरुखने दिला धीर

वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत याआधी धडकलेल्या सर्व भारतीय संघांच्या तुलनेत यंदाचा भारतीय संघ सरस होता. त्याचप्रमाणे यंदाच्या ऑस्ट्रेलियन संघांच्या तुलनेत विद्यमान संघ कमकुवत होता. तरीही अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर बाजू उलटवली. या पराभवामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली.

World Cup मधील टीम इंडियाच्या पराभवानंतर रडली अनुष्का; शाहरुखने दिला धीर
Anushka Sharma and Shah Rukh KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 8:51 AM

मुंबई : 20 नोव्हेंबर 2023 | कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली टीम इंडिया रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरला. वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सलग 10 दहा सामने जिंकले होते. मात्र अकराव्या अंतिम सामन्यात मुरब्बी ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी बाजू उलटवली. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. या पराभवानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचली होती. टीम इंडियाच्या पराभवानंतर अनुष्कालाही अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ती भावूक झाल्याचं पहायला मिळत आहे. अशातच बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानने ट्विट करत टीम इंडियाला धीर दिला.

काय म्हणाला शाहरुख?

‘टीम इंडिया संपूर्ण टूर्नामेंटमध्ये ज्याप्रकारे खेळली ती सन्मानाची बाब आहे. त्यांनी खूप उत्साह आणि चिकाटी दाखवली. हा एक खेळ आहे आणि त्यात एखाद-दुसरा वाईट दिवस असतोच. दुर्दैवाने ते आज घडलं. परंतु क्रिकेटमधील आपल्या खेळाचा वारसा ज्या पद्धतीने टीम इंडियाने पुढे नेला, ते पाहून मला त्यांचा फार अभिमान वाटतो. यासाठी मी टीम इंडियाचे आभार मानतो. तुम्ही संपूर्ण भारताला खूप आनंद दिला. प्रेम आणि आदर. तुम्ही आम्हाला एक अभिमानी राष्ट्र बनवलात’, अशा शब्दांत शाहरुखने टीम इंडियाचं कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

शाहरुख त्याच्या कुटुंबीयांसोबत वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी, मॅनेजर पूजा ददलानी, मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूडमधील इतरही बरेच सेलिब्रिटी टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, आयुषमान खुराना, शनाया कपूर यांसारखे सेलिब्रिटी स्टेडियमवर उपस्थित होते.

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात एकाही बॅट्समनला म्हणावी अशी छाप पाडता आली नाही. रोहित शर्मा अर्धशतकाच्या समीप पोहोचून मोक्याच्या क्षणी बाद झाला. विक्रमवीर विराट कोहली अर्धशतक झळकावून लगेचच बाद झाला. तर के. एल. राहुलचं अर्धशतक सावकाश गतीमुळे संघासाठी कुचकामी ठरलं. शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे इतर फलंदाजसुद्धा अपयशी ठरले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.