AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात कोणी पाठवला? परदेशातून भारतात पार्थिव आणण्याची काय आहे प्रक्रिया?

दुबईत बाथटबमध्ये श्रीदेवी यांनी घेतला अखेरचा श्वास, दुबईतून भारतात कोणी पाठवला अभिनेत्रीचा मृतदेह? आतापर्यंत 'त्या' व्यक्तीने अनेक मृतदेह भारतात आणण्यासाठी घेतलाय पुढाकार...

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात कोणी पाठवला? परदेशातून भारतात पार्थिव आणण्याची काय आहे प्रक्रिया?
| Updated on: Mar 01, 2025 | 8:16 AM
Share

Sridevi: 2018 मध्ये श्रीदेवी यांच्या निधनाची माहिती समोर आली आणि सर्वांना मोठा धक्का बसला. दुबईत एका लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी यांचं अचानक निधन झाल्यामुळे कुटुंबावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला. आज श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील त्यांच्या अनेक आठवणी सिनेमांच्या माध्यमातून जिवंत आहेत. श्रीदेवी यांचं निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव भारतात येईल का? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला होता. यावेळी एका व्यक्तीने अभिनेत्रीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबियांची मदत केली होती.

श्रीदेवी यांचा मृतदेह दुबईहून भारतात आणण्यासाठी अशरफ थामारास्सेरी यांनी मदत केली होती. कुटुंबियांच्या वतीने अशरफ यांनीच अभिनेत्रीचा मृतदेह दुबईतील अधिकाऱ्यांकडून घेतला होता. अशरफ यांनी श्रीदेवी यांचा मृतदेह भारतात पाठवला होता. अशरफ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अशरफ हे मूळचे केरळचे असून सध्या अरब अमिरातीतील अजमान येथे राहतात.

अशरफ यांनी फक्त श्रीदेवी यांचाच नाही तर, अन्य अनेक पार्थिव देखील त्यांच्या नातेवाईकांपर्यंत मोफत पोहोचवले आहेत. पण दुसऱ्या देशात आपल्या देशात पार्थिव आणण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. शिवाय काही कागदपत्रांची देखील गरज भासते.

काय आहे पूर्ण प्रक्रिया?

– कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटलमधून मृत्यू घोषणा पत्र घ्यावं लागतं आणि त्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात सांगवं लागते. त्यानंतर दुबई पोलिस ना हरकत प्रमाणपत्र जारी करतात आणि मृत्यू प्रमाणपत्र जारी केलं जातं. त्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे पुढील प्रक्रिया ठरवावी लागते. या मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारणही लिहिलेलं असते.

– मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर व्हिसा किंवा लेबर कार्डबाबत काम करावं लागतं. या प्रक्रियेत, कामगार मंत्रालय आणि इमिग्रेशन विभागाकडून मृत व्यक्तीचा व्हिसा किंवा लेबर कार्ड रद्द करावं लागतं.

व्हिसा रद्द झाल्यानंतर, मृत व्यक्तीच्या कुटुंबाला कार्गो बुकिंग करावं लागतं. कार्गो बुकिंगची प्रक्रिया झाल्यानंतर, एअरलाइनला कन्फरमेशन लेटर सोबत हॉस्पिटलशी संपर्क साधावा लागतो, जेथे एम्बॅलिंग प्रमाणपत्र आणि विमानतळाला ना हरकत पत्र दिले जाते. व्यक्ती व्हीआयपी असल्यास प्रक्रिया वेगळी असू शकते.

– या तीन कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा लागतो. मृत्यूची नोंद झाल्यानंतर, भारतीय दूतावास मृत्यू प्रमाणपत्र जारी करते आणि मृत व्यक्तीचा पासपोर्ट रद्द करते.त्यासोबत वैद्यकीय कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर मृतदेह विमानतळावर नेण्याचे पत्र दिले जाते.

यावेळी कोणत्या कागदपत्रांची भासते गरज…

– मेडिकल रिपोर्ट

– मृत्यू प्रमाणपत्र

– पोलीस रिपोर्ट (इंग्रजी भाषांतर आवश्यक)

– पासपोर्ट आणि व्हिजा कॉपी

– अन्य कागदपत्र

सांगायचं झालं तर, ही प्रक्रिया प्रत्येक देशाच्या स्थानिक नियमांच्या आधारे बदलली जाऊ शकते आणि त्या आधारावर प्रक्रिया पूर्ण केली जाते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.