AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh याच्या अडचणीत मोठी वाढ; कोरोना महामारीनंतर अभिनेत्याचे वाईट दिवस सुरु?

कोरोना महामारीनंतर 'या' कारणामुळे रणवीर सिंग याच्या अडचणीत मोठी वाढ; बॉलिवूडच्या प्रसिद्ध व्यक्तीने देखील सोडली अभिनेत्याची साथ... , सर्वत्र अभिनेत्याचीच चर्चा...

Ranveer Singh याच्या अडचणीत मोठी वाढ; कोरोना महामारीनंतर अभिनेत्याचे वाईट दिवस सुरु?
| Updated on: Apr 16, 2023 | 4:08 PM
Share

मुंबई : ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गली बॉय’ आणि ‘गोलियो की रासलीलाः रामलीला’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने चाहत्यांच्या मनात घर केलं. अभिनेता कायम त्यच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून एकापेक्षा एक सिनेमात झळकणाऱ्या रणवीर याचे सिनेमे आता बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरताना दिसत आहेत. कोरोना महामारीनंतर रणवीरच्या एकाही सिनेमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं नाही. कोरोना महामारीनंतर २०२१ मध्ये क्रिकेटचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता झळकला. ‘ 83’ सिनेमानंतर रणवीर ‘जयेशभाई जोरदार’ (2022) सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त १६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला.

रणवीर स्टारर ‘सर्कस’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त आणि फक्त ३५.६५ रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाला प्रेक्षकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कोरोनातंर अभिनेत्याचे तीन सिनेमे अपयशी ठरले. रणवीर स्टारर प्रत्येक सिनेमाला येणार अपयश पाहाता यश राज फिल्म्स (YRF)ने रणवीरसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यश राज फिल्म्समध्ये आदित्य चोप्रा आणि त्याच्या टीमने ‘स्पाय यूनिव्हर्स’मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ज्यामुळे यश राज फिल्म्स कोणत्याही प्रकारचा धोका पत्कारायचा नाही. महत्त्वाचं म्हणजे, अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर यश राज फिल्म्सना कोणतीही चूक करायची नाही.

यश राज फिल्म्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘प्रत्येक सिनेमाचं बजेट खूप मोठे असणार आहे आणि त्यामुळे त्रुटीसाठी जागा असू शकत नाही. म्हणून यश राज फिल्म्स (YRF)ने रणवीरसोबत काही काळ काम न करण्याचा निर्णय घेतला आहे.’ यश राज फिल्म्स (YRF)ने घेतलेल्या निर्णयामुळे रणवीरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

रणवीरने यश राज फिल्म्स (YRF)सोबत जवळपास सहा सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘बँड बाजा बारात’, ‘लेडीज वर्सेज रिकी बहल’ (२०११), ‘बेफिक्रे’ (२०१६), गुंडे (२०१४), किल दिल (२०१४) आणि जयेशभाई जोरदार यश राज फिल्म्सच्या या सिनेमांमध्ये रणवीरने मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं, पण काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.