AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aloe Vera Juice Benefits : दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडचा रस प्या आणि निरोगी आयुष्य जगा, वाचा याबद्दल!

या हंगामाच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत तीव्र डोकेदुखीपासून ते निर्जलीकरण, कोरडी त्वचा आणि पोटाच्या समस्या होऊ लागतात. मात्र, आपण या समस्यांसाठी अनेक घरगुती उपाय देखील वापरू शकता. यापैकी एक कोरफड आहे.

Aloe Vera Juice Benefits : दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडचा रस प्या आणि निरोगी आयुष्य जगा, वाचा याबद्दल!
कोरफडचा रस
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 7:57 AM
Share

मुंबई : या हंगामाच आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत तीव्र डोकेदुखीपासून ते निर्जलीकरण, कोरडी त्वचा आणि पोटाच्या समस्या होऊ लागतात. मात्र, आपण या समस्यांसाठी अनेक घरगुती उपाय देखील वापरू शकता. यापैकी एक कोरफड आहे. कोरफडीचा रस खूप फायदेशीर असतो. शरीराला आवश्यक हायड्रेशन पुरवण्यापासून ते अनेक आजार बरे करण्यास मदत करते. (Aloe Vera Juice is extremely beneficial for health)

कोरफडीचा रस आहारात समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते. रोगांपासून मुक्त होण्याव्यतिरिक्त, ते शरीराला शीतलता देखील प्रदान करते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोरफडीच्या रसाचे सेवन केले तर तुम्ही अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता. कोरफडीचा रस पिण्याचे नेमके कोणते फायदे होतात, हे आपण जाणून घेऊयात. कोरफडीचा रस पिण्याचे फायदे

डोकेदुखीपासून आराम – या हंगामात अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. यामधून आराम देण्याचे काम कोरफड रस करतो. कोरफडीचा रस रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते – जर पोट स्वच्छ नसेल तर शरीर अनेक समस्यांना बळी पडते. जर तुम्ही रोज कोरफडीचा रस घेत असाल तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते – शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी कोरफडीचा रस देखील प्रभावी आहे. शरीरात अनेक विषारी पदार्थ असतात. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. कोरफडच्या रसाचे सेवन आरोग्याच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. यामुळे शरीर आणि त्वचा निरोगी राहते.

अशक्तपणा दूर ठेवतो – शरीरातील निरोगी लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे बरेच लोक अशक्तपणाचे बळी ठरतात. अशा परिस्थितीत कोरफडीचा रस एक ग्लास आपल्याला या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकतो. रिकाम्या पोटी कोरफडीचा रस घेतल्याने लाल रक्तपेशींची संख्या वाढते आणि अशक्तपणाची समस्या दूर होते.

भूक कमी करण्यास मदत करते – बऱ्याच लोकांना दिवसभर भूक लागत नाही. विशेषतः उन्हाळ्यात भूक कमी होते. कोरफडीचा रस प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते. पोटाच्या समस्यांमुळे ही स्थिती उद्भवते आणि कोरफड त्यावर मात करण्यास मदत करते.

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी – कोरफड जेल चेहऱ्यावर लावण्याव्यतिरिक्त, त्याचा रस पिण्याचे देखील अनेक फायदे आहेत. यामुळे चेहरा निर्दोष होतो आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Aloe Vera Juice is extremely beneficial for health)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.