AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांच्या वापरातून करा, उन्हापासून केसांचे संरक्षण.. जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे आणि डोक्याला घाम येणे यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत टाळूला खाज सुटणे, केस गळणे आणि तुटणे हे लक्षणीय वाढते. अशा परिस्थितीत या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.

‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांच्या वापरातून करा, उन्हापासून केसांचे संरक्षण.. जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !
| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 5:17 PM
Share

उन्हाळ्यात केसांच्या अनेक समस्या तोंड वर काढतात. केसांत कोंडा (dandruff) होणे, घामामुळे खाज सुटणे, केसांना दुर्गंधी येणे इत्यादी अनेक समस्या उन्हाळ्यात उद्भवतात. केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी आपण ‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांचा वापर करून, केसांचे संरक्षण (Hair protection) करू शकतो. उन्ह्याळ्यात केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, खोबरेल तेल आणि कापूर दोन्ही मिसळून डोक्याला मसाज करा. या तेलामध्ये (Oil) दाहक-विरोधी, प्रतिजैविक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन (कोकोनट ऑइल) सारखे पोषक घटक देखील आढळतात. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. दुसरीकडे, कापूरमध्ये सॅबिनीन, फेल्डरेनोन आणि लिमोनेन सारखे पोषक घटक असल्याने, ते केसांचे चांगल्या पद्धतीने केसांचे पोषण (Hair nutrition) करण्यास सहाय्यक ठरतात. चला तर मग, जाणून घेऊया उन्हाळ्यात केंसाचे संरक्षण करण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर वापराची योग्य पद्धत

अशा प्रकारे लावा तेल

खोबरेल तेल थोडावेळ उन्हात ठेवा, असे केल्याने ते थोडे गरम होईल. यानंतर त्यात बारीक कापूर टाका. ते चांगले मिसळा. आता त्यात टी ट्री ऑइलचे काही थेंब टाका. याने डोक्याला मसाज करा. हे तेल ३ ते ४ तास तसंच राहू द्या. आपण ते रात्रभर देखील केसांना लावून ठेवू शकता. यानंतर सकाळी केस सौम्य शाम्पूने धुवा. हे टाळू स्वच्छ करण्याचे काम करते. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते.

केसांना कापूर आणि खोबरेल तेल लावण्याचे फायदे

टाळूची खाज दूर करते : उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये टाळूवर घामामुळे खाज येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी तुम्ही हे तेल वापरू शकता. हे तेल टाळूची खाज दूर करण्याचे काम करते.

कोंडयापासून सुटका करते

केसांत खाज येणे आणि कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे. यापासून आराम मिळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु ते केसांचे दीर्घकाळ नुकसान करतात. अशावेळी, आपण खोबरेल तेल आणि कापूर देखील वापरू शकता. हे केसांमधील कोंडा दूर करते. या तेलाने टाळूची चांगली मसाज करा. केसांमध्ये जर उवा असतील तर त्याही दूर होण्यास मदत होते.

केस गळणे थांबवते

कडक सूर्यप्रकाशामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसगळती सुरू होते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी खोबरेल तेल आणि कापूर हा रामबाण उपाय आहे.

( वरील टीप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा. )

इतर बातम्या-

जीवघेण्या स्पर्धा | पोलिसांच्या नाकावर टिच्चून बीडमध्ये रंगली रेड्यांची चित्तथरारक झुंज; एक रेडा जखमी

Gunratna Sadavarte: सदावर्तेंनी आतापर्यंत दीड कोटी गोळा केले, वकिलांचा कोर्टातील युक्तिवाद काय?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.