AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’… असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर

प्रसूतीनंतर, शरीराची संपूर्ण झीज झालेली असते. शारीरिक त्रासामुळे काही दिवस जड अन्न खाता येत नाही. त्यामुळे शरीराला ताकद आणि पोषण देण्यासाठी प्रसूत मातेला हलके अन्‌ पौष्टिक अन्नघटक दिले जातात. या लेखात आम्ही तुम्हाला प्रसूतीनंतरच्या अशाच काही घटकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे प्रसूतीनंतर मातांच्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’... असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 1:33 PM
Share

मुंबई : प्रसूत (Delivery) होणे म्हणजे महिलांनी दुसरा जन्म घेतल्यासारखं मानल जात. गर्भधारणा केल्यानंतर, ते प्रसूत झाल्यावरदेखील काही महिने महिलांना अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. बाळाला जन्म देणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप तणावपूर्ण तितकेच त्रासदायक ठरत असते. 2.5 ते 3 किलो वजनाचे मूल नऊ महिने पोटात ठेवणे आणि नंतर प्रचंड वेदना सहन करून त्याला जन्म देणे ही काही किरकोळ गोष्ट नाही. मुलाच्या जन्मानंतर, स्त्रीच्या शरीराला विश्रांती (Rest) आणि चांगला आहार (Diet) आवश्यक असतो. प्रसूतीत महिलांच्या शरीराची प्रचंड झीज होत असते. त्यामुळेच त्यांना पुन्हा शक्ती मिळावी व लवकर बरी व्हावी यासाठी तिच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर अनेक बदलांतून जाते. त्यांना विश्रांती आणि पुन्हा पूर्वीसारखी शक्ती मिळण्यासाठी काही काळ द्यावा लागत असतो. नवीन मातांना त्यांची पचनसंस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे, प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना दाळी, रवा आदी सहज पचण्याजोग्या गोष्टी दिल्या जातात. रवा गांजी ही एक पौष्टिक रेसिपी आहे. सहज पचते आणि प्रसूतीनंतर पहिल्या दिवसापासून नवीन माता हे खाऊ शकतात.

रवा गांजी बनवण्यासाठीचे घटक

या रेसिपीसाठी तुम्हाला दोन चमचे रवा, एक कप पाणी, 8 बदाम, एक चमचा साखर आणि अर्धा कप दूध आवश्यक आहे. मिक्सरमध्ये बदाम बारीक वाटून घ्या. आता ते बाजूला ठेवा आणि गॅसवर एका भांड्यात पाणी उकळा. तोपर्यंत कढईत रवा भाजून घ्या. रवा तपकिरी होण्यापूर्वी गॅस बंद करा. आता हळूहळू रवा उकळत्या पाण्यात घाला आणि सतत ढवळत राहा. नंतर त्यात साखर, बदाम पावडर आणि कोमट दूध घाला. दोन ते तीन मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा.

या टिप्स लक्षात ठेवा

उकळत्या पाण्यात रवा घालताना सतत ढवळत राहा नाहीतर त्यात गुठळ्या तयार होतील. साखरेऐवजी गूळही घालू शकता. गूळ घातल्यावर लगेच गॅस बंद करा आणि नंतर कोमट दूध घाला.

रव्यातील पोषक घटक असे

100 ग्रॅम रव्यामध्ये 10.3 ग्रॅम प्रोटीन, एक ग्रॅम फैट, 10.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3.6 ग्रॅम फायबर, 0.39 मिलीग्राम थायामिन, 0.072 मिलीग्राम फॉलिक असिड, 0.08 मिलिग्रॅम व्हिटॅमिन बी 4, 3.6 ग्रॅम फायबर, 0.105 मिलीग्राम झिंक, 0.19 मिलीग्राम कॉपर, 1 मिलीग्राम सोडियम आणि 136 मिलीग्राम फॉस्फरस असते.

संबंधित बातम्या :

त्वचेला ‘फंगल’पासून वाचवण्यासाठी ‘या’ पाच चुका टाळाच

तुम्ही कमी पाणी पिता का?, सावधान! तुम्हाला होऊ शकतात गंभीर आजार

चीन आणि ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णात वाढ, पुन्हा येतेय चौथी लाट?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.