AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरील उपाय..

Health Tips उचकी लागणे यामागे अनेक कारणं असतात. उचकी लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे यावर उपायही आहेत. मात्र कोणा कोणाला उचकी खूप वेळ असेल तर डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे. उचकी कशामुळे येते आणि ती कशी थांबता येईल ते बघणार आहोत.

खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरील उपाय..
उचक्या लागण्याची कारणं आणि उपाय
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 11:49 AM
Share

अगं किती ती उचकी येतेय तुला, नक्की कोणतरी आठवण काढतेय तुझी…उचली लागली तर पहिले हे वाक्य ऐकायला येतं. पण खरंच कोणी आठवण काढली की उचकी लागते का?, तरी नाही. यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. उचकी लागण्याचे अनेक कारणं आहेत. उचकी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

का लागते उचकी?

उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन वावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते. यावेळी फुप्फुसातील हवा बाहेर येते आणि अशावेळी होणारा आवाज म्हणजे उचकी. ही क्रिया घडत असताना आपण श्वास आत घेऊ शकत नाही म्हणून उचकी लागली की आपल्याला अस्वस्थत वाटतं. उचकी ही काही वेळेसाठी येते मात्र ही थांबत नसेल आणि खूप वेळ येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

उचकी येण्यामागे काय आहेत कारणं?

1. लवकर लवकर जेवणे 2. जास्त मसाले असलेलं जेवण 3. काही लोकं एक्साइडिट झाल्यावर येते उचकी 4. तनाव असेल तरी येते उचकी

उचकी घालवण्याचे खास ट्रिक्स

1. श्वास काही वेळासाठी रोखून धरा 2. थंड पाणी प्या 3. जीभ बाहेर काढा आणि थोडा वेळ तसेच राहा. यामुळे घशामधील मांसेपेशी ओढल्या जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल. 4. तुम्ही खाली बसा आणि गुडघ्याला छातीजवळ आणा आणि दोन मिनिटं या स्थित बसा. 5. उचकी लागली तर साखर खा 6. लिंबू आणि मधाचं चाटण खा 7. चॉकलेट पावडरचं सेवन करा 8. मीठाचं पाणी प्या 9. तीन काळेमीरे आणि खडी साखर चावून खा आणि त्यावर पाणी प्या 10. टमाटर चावून चावून खा 11. पीनट बटर खा 12. उलटे आकडे मोजा 13. असं म्हणतात उचकी लागलेल्या माणसाला घाबरविल्यास उचकी लगेचच थांबते.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या-

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

महाराष्ट्रातील घाटात पंजाबमधील ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.