AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानातून पुन्हा एका बांगलादेशाची निर्मिती? थेट पाकिस्तान संसदेत चर्चा

अल जजीराच्या रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये विरोधात बोलणारे कार्यकर्ते आणि नागरिक बेपत्ता होत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे विद्रोह अधिक वाढत आहे.

पाकिस्तानातून पुन्हा एका बांगलादेशाची निर्मिती? थेट पाकिस्तान संसदेत चर्चा
pakistan mp
| Updated on: Feb 21, 2025 | 1:31 PM
Share

पाकिस्तानची फळणी होऊन 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली. त्यानंतर पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती शांत झाली नाही. देशात बंडाचे वारे सुरुच असतात. बलूचिस्तानमधील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्याबद्दल पाकिस्तान संसदेत चर्चा झाली. खासदार मौलाना फजल उर रहमान यांनी मोठे वक्तव्य केले. पाकिस्तानातून आणखी एका बांगलादेशची निर्मिती होवू शकते, असे मौलाना फजल यांनी म्हटले आहे. बलूचिस्तान प्रातांतील पाच ते सात जिल्हे स्वत:ला स्वतंत्र घोषित करु शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

…तर पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात

पाकिस्तानच्या संसदेत बोलताना फजल उर रहमान म्हणाले की, बलूचिस्तानमधील जिल्हे स्वतंत्र जाहीर करु शकतात. या जिल्ह्यांनी स्वत:ला स्वतंत्र घोषित केले आणि संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली तर पाकिस्तानचे आस्तित्व धोक्यात येणार आहे.

कुर्रम भागात हिंसाचार वाढत असताना फजल उर रहमान यांचे वक्तव्य आले आहे. या भागात दीर्घकाळापासून सिया अन् सुन्नी यांच्यात वाद सुरु आहे. नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या या संघर्षामुळे आतापर्यंत 150 जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या भागातील कबायली गट मशीगन आणि इतर अत्याधुनिक शस्त्रांनी लढत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानजवळ असलेला हा पहाडी भाग पूर्णपणे वेगळा झाला आहे.

का आहे बलूचिस्तानचा वाद

बलूचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा भूभाग आहे. परंतु या भागात लोकसंख्या अंत्यत कमी आहे. केवळ दोन टक्के लोकसंख्या या भागाची आहे. हा प्रदेश अनेक वर्षांपासून फुटीरतावादी बंडखोरीशी झुंज देत आहे, कारण बलुच फुटीरतावादी गटांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांवर अधिक स्वायत्तता आणि नियंत्रण हवे आहे. या संघर्षामुळे या प्रांतात अनेक दशकांपासून हिंसाचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटना घडल्या आहेत.

अल जजीराच्या रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये विरोधात बोलणारे कार्यकर्ते आणि नागरिक बेपत्ता होत आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे स्थानिक लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे विद्रोह अधिक वाढत आहे.

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.