AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

माणसाच्या बुध्दीस मुक्त करणं आणि त्यास आधुनिक, निष्कलंक आणि परिपूर्ण करणं हाच सामाजिक सुधारणेचा उद्देश आहे. आपल्या बुध्दीस (पर्यायाने विचारास) उर्ध्वगामी करत जाऊन त्याला सतत ‌‌‌क्रियाशील ठेवणे, हे जर आम्ही करू शकलो नाही, तर मग आपल्याकडून आपल्या पूर्वजांप्रमाणे काहीतरी भव्यदिव्य होण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल.

महाराष्ट्रातील उदारमतवादी समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Mahadev govind Ranade
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 10:36 AM
Share

महाराष्ट्रातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थतज्ज्ञ म्हणून ओळख मिळवलेले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आज जन्म दिवस (18 जानेवारी 1842) रोजी नाशिकमधील निफाड गावी त्यांचा जन्म झाला. मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले तसेच माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईत झाले.

माणसाच्या बुध्दीस मुक्त करणं आणि त्यास आधुनिक, निष्कलंक आणि परिपूर्ण करणं हाच सामाजिक सुधारणेचा उद्देश आहे. आपल्या  विचारास उर्ध्वगामी करत जाऊन त्याला सतत ‌‌‌क्रियाशील ठेवणे, हे जर आम्ही करू शकलो नाही, तर मग आपल्याकडून आपल्या पूर्वजांप्रमाणे काहीतरी भव्यदिव्य होण्याची अपेक्षा सोडून द्यावी लागेल.  असे न्या. रानडे म्हणत असत.

वाचनाच्या छंदाने घडवले आयुष्य

महादेव गोविंद रानडे यांना वचनाची विलाक्षण आवड होती. शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला होता. त्यांना वाचनाची आवड होती त्यामुळे त्यांनी शैक्षणिक अभ्यासाव्यतिरिक्‍त इतर विषयांचेही अनेक ग्रंथ अभ्यासले. वर्ष 1862 मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. वर्ष 1864 मधे एम.ए.ची परीक्षा दिली व वर्ष 1865 मध्ये कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये त्यांचा समावेश झाला. वर्ष 1866 च्या जूनमध्ये त्यांची सरकारच्या ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी नेमणूक झाली. मराठी भाषेत जे ग्रंथ त्या वेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र विषय यासंबंधी त्यांच्या अभिप्रायांत विस्तृत विवेचन केलेले आढळते. वर्ष 1868 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. त्यानंतर वर्ष 1871 मधे पुण्यास न्यायखात्यात दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. हे पद न्यायाधीशाचे समान होते.

सार्वजनिक सभेची सूत्रे घेतली हाती

भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. पुढे सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक यांनी मोठी कामगिरी केली. स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले. भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा केली होती. न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर 1893 साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. त्या काळात भारतीयांना उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद मिळणे अभिमानाची गोष्ट होती. त्यावेळी पुण्यातील जनतेने हा प्रसंग उत्सवासारखा साजरा केला. न्यायदानाच्या कामात त्यांनी नि:स्पृहपणा, कायदेशास्त्राचे सखोल ज्ञान व न्यायनिष्ठा हे त्यांचे गुण दाखवून दिले.

(गुगलवरून साभार )

Investment Schemes : मुलांचे लग्न ते शिक्षणाचा खर्च, दीर्घकालीन गुंतवणुकीचा ‘अर्थ’मार्ग, मॅच्युरिटीवेळी बंपर रिटर्न!

RIP ND Patil | ‘आबाsss न्याय मिळायला पाहिजे’ असं एनडी पाटील आरआर पाटलांवर का ओरडले होते?

Satara : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू, साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दुर्दैवी घटना

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.