AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद महापालिकेत असतील 126 नगरसेवक, प्रभागांची संख्या 42 वर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

वाळूजजवळील सिडकोची महानगरे औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. दोन आठवड्यांत त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. तसे झाल्यास नगरसेवक, प्रभागांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद महापालिकेत असतील 126 नगरसेवक, प्रभागांची संख्या 42 वर, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
महापालिका निवडणुकीसाठीच्या कामांना वेग
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 10:22 AM

औरंगाबादः महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या दृष्टीने प्रभागांची रचना कशी असेल, नगरसेवक किती असतील, यासंबंधीच्या निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काम मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादमधील नगरसेवकांची (Aurangabad corporators) संख्या 17 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे 2021 या वर्षात जनगणना झाली नसली तरीही लोकसंख्या आणि मतदार वाढले आहेतच. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने सर्वच महापालिकांमध्ये 17 टक्के नगरसेवक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार औरंगाबादच्या महापालिकेत (Aurangabad corporation) आता 115 ऐवजी 126 नगरसेवक असतील. तसेच प्रभागांची संख्याही 38 वरून 42 पर्यंत जाईल.

…तर निवडणूका लांबणीवर जाण्याची शक्यता

वाळूजजवळील सिडकोची महानगरे औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. दोन आठवड्यांत त्यावरही मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल. तसे झाल्यास नगरसेवक, प्रभागांची संख्याही वाढेल. पण हद्दवाढीविरोधात याचिका दाखल झाल्यास मनपा निवडणूक आणखी पुढे ढकलली जाऊ शकते. नगरसेवकांची संख्या वाढल्याने स्वीकृत सदस्य संख्याही पाचवरून सहा होण्याची शक्यता आहे. प्रभाग हद्दी, आरक्षणही नव्याने ठरवावे लागेल. त्यावर आक्षेप दाखल होऊन पुन्हा कोर्टात प्रकरण जाऊ शकते. त्यामुळे किमान एप्रिलपर्यंत निवडणूक लांबेल, अशी चिन्हे आहेत.

सीमा बदलणार, राजकीय गणितेही बदलणार

या नव्या निर्णयामुळे गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या नवख्या इच्छुकांसमोर पुन्हा आरक्षण, हद्दवाढीसाठी लढाई करण्याचे संकट उभे राहणार आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयाचे एमआयएमने स्वागत केले आहे. ‘शहर वाढते आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधींची संख्याही वाढायला हवी’ असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले, तर भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी ‘निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सत्ताधाऱ्यांची ही खेळी आहे,’ अशी टीका केली.

इतर बातम्या 

Aurangabad: ढासळलेल्या मेहमूद दरवाज्याच्या संवर्धनासाठी नव्याने निविदा, 38 लाख रुपये खर्च करणार

औरंगाबाद विमानतळावरही खासगीकरणाचे वारे, सोयी- सुविधा, प्रवासी संख्येची सविस्तर माहिती मागवली

पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.