AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power Cut ! मुंबईची बत्ती गुल; कंगनाचा ठाकरे सरकारवर निशाणा

अभिनेत्री कंगना रणौतशिवाय प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्विटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे.

Mumbai Power Cut ! मुंबईची बत्ती गुल; कंगनाचा ठाकरे सरकारवर निशाणा
| Updated on: Oct 12, 2020 | 2:18 PM
Share

मुंबई: संपूर्ण मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई-ठाणेकर त्रस्त झालेले असतानाच नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून मीम्सच्या माध्यामातून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नेटवर मीम्सचा पाऊस पडत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनेही या संधीचा फायदा घेत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.(kangana ranaut slams maharashtra government)

वीज पुरवठा खंडित झाल्याने कंगनाने एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यानंतर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिली असून ‘मुंबईमध्ये Powercut, अशावेळी महाराष्ट्र की सरकार क-क-क……कंगना’, अशी खोचक टीका कंगनाने केली आहे. तर, अभिनेते अनुपम खेर यांनीही ‘बत्ती गुल’ असं ट्विट करत महाराष्ट्र सरकारला डिवचले आहे. अरमान मलिकनेही वीज गेल्याचं म्हटलं आहे.

या शिवाय प्रसिद्ध लेखिका आणि स्तंभलेखिका शोभा डे यांनीही ट्विट केलं आहे. संपूर्ण मुंबईत वीज गायब झालीय. हे अनपेक्षित आहे. एखाद्या बोगद्यात असावं अशा पद्धतीने मुंबई अंधारात गेलीय, अशी टीका शोभा डे यांनी ट्विटमधून केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी मुंबई महापालिका आणि टाटा पॉवरला टॅगही केलं आहे.

दरम्यान, आज संपूर्ण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबई अंधारात गेली होती. महापारेषणच्या सर्किट केंद्राचे देखभाल दुरूस्तीचे काम सुरू होते. मात्र अचानक बिघाड झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सोमोरे जावे लागले, असं मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं. दरम्यान, वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर देखील झाला. त्यामुळे मुंबईकडे कामावर येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड खोळंबा झाला. या चाकरमान्यांना सुमारे दोन ते अडीच तास लोकलमध्ये खोळंबून राहावे लागले होते. त्यामुळे अनेक प्रवासी संतापही व्यक्त करत होते. (kangana ranaut slams maharashtra government)

संबंधित बातम्या:

mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

(kangana ranaut slams maharashtra government)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.