AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Metro : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घ्या मेट्रोचा आनंद, मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए मार्गीकेचं काम पूर्ण

मुंबईकरांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या आणखी दोन मार्गांचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागणार आहे. यामुळे आता पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना मेट्रोचा आनंद घेता येणार आहे.

Mumbai Metro : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घ्या मेट्रोचा आनंद, मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए मार्गीकेचं काम पूर्ण
file photoImage Credit source: google
| Edited By: | Updated on: Mar 27, 2022 | 6:42 PM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी  एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) आणखी दोन मार्गांचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागणार आहे. दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणात प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असलेली पश्चिम उपनगरातील मेट्रो आता धावणार असून, यानिमित्ताने मुंबईचा (Mumbai) प्रवास आणखी वेगवान होणार आहे. यामुळे दोन मार्गांशी जोडलेले प्रवासी मेट्रोमध्ये प्रवासाचा आनंद घेऊन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेऊ शकणार आहे. मुंबईत मेट्रो -7 म्हणजेच रेड लाईन आणि मेट्रो -2 ए म्हणजेच यलो लाइनचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे. दोन्ही मार्गांवर चाचणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबईच्या (Mumbai) विविध स्थानकांचे कामही पूर्णत्वास आले आहे.

वाहतुकीच्या समस्येपासून सुटका

मेट्रो 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व पर्यंत साडे सोळा किलोमीटर (16.475 किमी) लांबीवर पसरली आहे. या मार्गावर एकूण 13 मेट्रो स्टेशन येत आहेत. पश्चिम द्रुतगती मार्गावर हा मार्ग तयार करण्यात आला आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीची समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे. तसेच, या मार्गाजवळ राहणाऱ्या लोकांना जलद प्रवासाचा पर्याय मिळेल आणि प्रवासाचा वेळ वाचेल.

गर्दीतून दिलासा मिळेल

मेट्रो 2-ए डीएन नगर ते दहिसर पर्यंत एकूण अठरा किलोमीटर (18.589 किमी) लांबीवर पसरली आहे. या मेट्रो मार्गात एकूण 17 मेट्रो स्टेशन येणार आहेत. हा मेट्रो मार्ग सध्याच्या मुंबई लोकल मार्गापासून दूर लिंक रोडवर हलवून तयार केला जात आहे. ही मेट्रो पूर्ण झाल्यानंतर, या 17 मेट्रो स्थानकांच्या आसपास राहणाऱ्या लाखो प्रवाशांना जलद हालचाली मिळतील. याशिवाय मुंबई लोकलच्या गर्दीतूनही लोकांना दिलासा मिळेल. या दोन्ही महानगरांचे भूमिपूजन ऑक्टोबर 2015 मध्ये झाले. काम 2016 मध्ये सुरू झाले. आता हे आव्हानात्मक काम पूर्णत्वास आले आहे. एमएमआरडीएने त्यांच्या कार्याचा मुहूर्त जाहीर केला आहे.

अखेर मुहूर्त लागला

मेट्रो 7 आणि मेट्रो 2-ए पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागणार आहे. दोन्ही मेट्रोची अपेक्षित कामे जवळपास पूर्ण झाली असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून आवश्यक प्रमाणात प्राधिकरणाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असलेली पश्चिम उपनगरातील मेट्रो आता धावणार असून, यानिमित्ताने मुंबईचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. यामुळे दोन मार्गांशी जोडलेले प्रवासी मेट्रोमध्ये प्रवासाचा आनंद घेऊन पाडव्याच्या मुहूर्तावर घेऊ शकणार आहे.

इतर बातम्या

Tilak Varma Debut, IPL 2022: Mumbai indians चा 19 वर्षाचा लेफ्टी, 150 च्या स्ट्राइक रेटने करतो बॅटिंग, कोण आहे तिलक वर्मा?

चर्चा तर होणारचः मंत्री भुजबळांचा नायक 2; स्वस्त धान्य दुकानावर धडक भेट देत झाडाझडती, काय घडले बघाच…!

करिअरमधला पहिलाच रॅम्प वॉक अन् Shanaya Kapoor झाली ट्रोल; पहा Video

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.