AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin | निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी या 4 रसांचे नियमित सेवन करा आणि फरक बघा!

टोमॅटो हे त्वचा आणि आरोग्य दोन्हींसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने त्वचा तरूण दिसते. इतकेच नाहीतर टोमॅटो त्वचेला लावले तरीही टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते.

Skin | निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी या 4 रसांचे नियमित सेवन करा आणि फरक बघा!
Image Credit source: tezzbuzz.com
| Updated on: Jun 18, 2022 | 10:56 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला आपली त्वचा (Skin) सुंदर आणि तजेलदार हवी असते. यासाठी आपण अनेक उपाय देखील करतो. चमकदार त्वचेसाठी लोक विविध प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतात. या उत्पादनांमध्ये रसायने असतात. यामुळे त्वचेचे मोठे नुकसान होते. सौंदर्य उत्पादने (Beauty products) वापरण्यापेक्षा आपण त्वचेला खोल पोषण आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला हवा. हे पदार्थ भरपूर प्रमाणात पोषक असतात. ते त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर (Problem) मात करण्यास मदत करतात, निरोगी त्वचेसाठी तुम्ही फळे आणि भाज्यांपासून बनवलेले रस देखील आहारात समाविष्ट करू शकता. यामुळे फक्त तुमची त्वचाच चमकदार राहण्यास मदत होत नाहीतर हे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर ठरते.

टोमॅटो

टोमॅटो हे त्वचा आणि आरोग्य दोन्हींसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात. याचे सेवन केल्याने त्वचा तरूण दिसते. इतकेच नाहीतर टोमॅटो त्वचेला लावले तरीही टॅनची समस्या दूर होण्यास मदत होते. जर आपल्याला आपली त्वचा चमकदार आणि सुंदर हवी असेल तर दिवसातून एकदातरी टोमॅटोचे सेवन नक्कीच करा.

डाळिंब

डाळिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. डाळिंबाच्या रसाने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते आणि त्वचा चमकदार राहते. हे त्वचेला पोषक देते आणि सुंदर बनवते. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. म्हणून नियमितपणे एक ग्लास डाळिंबाचा रस प्या. मात्र, हे नेहमीच लक्षात असूद्या की, रस हा कधीही ताजा असतानाच प्या. आपण डाळिंबाच्या रसामध्ये एक लिंबू देखील टाकायला हवे. यामुळे तो रस अधिकच निरोगी बनतो.

पालक

हिरव्या पालेभाज्यांचा रस अतिशय चविष्ट तसेच आरोग्यदायी असतो. पालकाचा रस त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करतो. पालकाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि व्हिटॅमिन के असते. या रसामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि मॅंगनीज असतात. ते त्वचेला मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करतात. तसेच पालकाचा रस दररोज प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचा रस आपण चेहऱ्याला देखील लावू शकता.

कोरफड

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरफड ही आपल्या डोळ्यांसाठी, आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडच्या मदतीने आपण त्वचेच्या असंख्या समस्या दूर करू शकतो. तसेच ज्यांना केसांच्या काही समस्या आहेत, अशांसाठी देखील कोरफड फायदेशीर ठरते. कोरफडमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होते. यामुळे आपण किमान आठ दिवसातून एकदा तरी कोरफडच्या रसाचे नक्कीच सेवन करायला हवे. यामुळे आरोग्य, त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होतात.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.