AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded मध्ये विद्युत सहाय्यक भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप, नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणी

महावितरण कंपनी (MSEDCL) मार्फत घेण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप नांदेड (Nanded) मधील उमेदवारांनी केला आहे. 2019 मध्ये विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदाच्या पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास अडीच हजार जागा भरण्यात आल्या आहेत.

Nanded मध्ये विद्युत सहाय्यक भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप, नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणी
नियमानुसार जागा भराव्या उमेदवारांची मागणीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 6:58 AM
Share

नांदेड – महावितरण कंपनी (MSEDCL) मार्फत घेण्यात आलेल्या विद्युत सहाय्यक भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप नांदेड (Nanded) मधील उमेदवारांनी केला आहे. 2019 मध्ये विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदाच्या पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास अडीच हजार जागा भरण्यात आल्या आहेत. उर्वरित अडीच हजार जागा तरी नियमानुसार भरण्यात याव्या अशी मागणी उमेदवारानी केली आहे. उमेदवारांचे बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण गृहीत न धरता. एकूण गुण गृहीत धरण्यात येणार असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. त्यावेळी जवळपास सव्वा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवडीची पहिली यादी लावण्यात आली, त्यात काही उमेदवारांच्या बाबतीत गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही पात्र विद्यार्थ्यांचे बेस्ट ऑफ 6 ऐवजी बेस्ट ऑफ फाईव्हचे गुण ग्राह्य धरण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

काही विद्यार्थ्यांनी 2021 चे शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र लावले. त्यांचीही निवड करण्यात आली आहे. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा 10 % आरक्षित कोटा भरण्यात आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे निवड यादी लावण्यापूर्वी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. तसेच प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त, माजी सैनिक उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप या उमेदवारानी केला आहे. त्यामुळे विद्यार्थी न्याय मागत आहेत. त्याचबरोबर आतातरी किमान उरलेली पदं नियमानुसार भरा अशी मागणी करीत आहेत. झालेल्या घोटाळ्याची सरकार दरबारी दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच पुन्हा परीक्षा घ्याव्यात अशी उमेदवारांची मागणी आहे.

पात्र उमेदवारांना डावलले

नांदेडच्या महावितरण कंपनीत पाच हजार जागा भरायच्या होत्या. त्यापैकी अधिकाऱ्यांनी आपल्या मनमर्जीने अडिच हजार पदे भरली आहेत. जाहीरातीत दिल्याप्रमाणे कोणतीही नियमावली अधिकाऱ्यांनी पाळली नसल्याची उमेदवारांनी तक्रार केली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी उमेदवारांची इच्छा आहे. तसेच उर्वरित अडीच हजार पदं तरी किमान नियमानुसार भरावी अशी उमेदवारांची मागणी आहे.

Nagpur Temperature | एप्रिल आलाय उन्हाचे चटके आणखी वाढणार; विदर्भातील तापमान 45 पर्यंत जाणार

आज होणार देवीच्या ‘कुष्मांडा’ अवताराचा जागर, जाणून घ्या पूजेची वेळ आणि सर्व काही एका क्लिकवर

National Maritime Day : व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस, राष्ट्रीय नौकानयन दिनाचा जाणून घ्या इतिहास?

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.