AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश, वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन

तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल( रेग्युलराईज) करून घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती, पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश, वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 6:11 PM
Share

औरंगाबादः गुंठेवारी भागातील अनियमित मालमत्ता नियमित करण्यासाठीची मोहीम औरंगाबाद महानगरपालिकेने (Aurangabad Municipal corporation) आणखी वेगवान केली आहे. ही मालमत्ता नियमित करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मात्र अनियमित मालमत्तांवर कारवाईसाठी मनपाचा जेसीबी चालवण्यासाठी बाहेर पडेन, असा इशारा महानगरपालिका प्रशासकांनी दिला होता. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी गुंठेवारीतील अनियमित मालमत्तांवर कारवाई न करण्याचे आदेश औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दिले आहेत.

01 नोव्हेंबर रोजी चालणार होते बुलडोझर

शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर असलेली गुंठेवारी क्षेत्रातील वाणिज्यिक (कमर्शिअल) बांधकामे तोडण्याचे महापालिका प्रशासनाने तयारी केली होती. मात्र, दिवाळीचा सण समोर असताना ही कारवाई तूर्त स्थगित करावी, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पालिका प्रशासनाला दिले. दरम्यान, तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल( रेग्युलराईज) करून घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

आतापर्यंत 1188 संचिका दाखल

महापालिकेने गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचे आवाहन केल्यानंतर आतापर्यंत 1188 संचिका दाखल झाल्या. त्यातील 694 जणांनी मनपाकडे 6 कोटी 76 लाख 90 हजार रुपये भरले, अशी माहिती नगररचना विभागाचे प्रभारी उपसंचालक जयंत खरवडकर यांनी दिली. मालमत्ता नियमितीकरणासाठी प्रामुख्याने सातारा-देवळाई, पडेगाव- मिटमिटा, गारखेडा, मुकुंदवाडी, रामनगर, जय भवानी नगर, सिडको-हडको, जाधववाडी, मयूर पार्क, हर्सूल, चिकलठाणा भागातील संचिका दाखल होत आहेत.

इतर बातम्या-

अपघात पाहताच थांबले, जखमी मुलाचा चेहरा रुमालाने पुसला, औरंगाबादेत डॉ. कराड यांनी दिला माणुसकीचा दाखला

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.