AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?

मंगळवारी सकाळी 10.51 ते 11.21 या अर्ध्या तासाच्या कालावधीत 52.2 मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच  औरंगाबाद शहरावर पुन्हा ढगफुटी पेक्षा  वेगाच्या पावसाने झोडपून काढले.

Aurangabad Rain: मध्यरात्रीतून पकडला पावसानं जोर, गुलाब चक्रिवादळामुळे औरंगाबादेत पुन्हा ढगफुटी, सरींचा वेग काय होता?
औरंगाबादेत सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस मंगळवारीही दिवसभरही शहरात बरसत होता.
| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 5:45 PM
Share

औरंगाबाद: गुलाब चक्रिवादळाचा धोका औरंगाबाद शहरासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना बसेल, अशा इशारा हवामान विभागाकडून (Indian Meteorological department) देण्यात आला होता. त्याप्रमाणे सोमवारी मध्यरात्रीतून सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढत गेला. औरंगाबाद शहरातही हेच दृश्य दिसून आले.  (Cloudburst in Aurangabad)यामुळे शहरातील विविध ठिकाणी घरात पाणी घुसले. तसेच वीजेचे खांब कोसळून विद्युत पुरवठाही खंडित झाला. दरम्यान मंगळवारी दिवसभरही पावसाची संततधार सुरुच होती.

पहाटे तीन वाजता पावसाने घेतले रौद्ररुप

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळामुळाचा फटका शहरालाही बसला. औरंगाबादमध्ये सोमवारी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पावसाचा वेग 110.07 मीमी प्रति तास मोजला गेला. त्यानंतर मंगळवारी सकाळी 10.51 ते 11.21 या अर्ध्या तासाच्या कालावधीत ढगफूटी पेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. या तीस मिनीटाच्या काळात पाऊस पड़ण्याचा  सरासरी  वेग हा 108.8 मीमी प्रति तास एवढा नोंदला गेला.

किती झाला पाऊस?

मंगळवारी सकाळी 10.51 ते 11.21 या अर्ध्या तासाच्या कालावधीत 52.2 मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच  औरंगाबाद शहरावर पुन्हा ढगफुटी पेक्षा  वेगाच्या पावसाने झोडपून काढले.   तर सोमवारी मध्यरात्रीतून सुरु झालेला पाऊस ते सकाळी 11.15 या वेळात झालेल्या पावसाची नोंद शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत 98.3 तर एमजीएम गांधेली वेधशाळेत 74.9 मीमी एवढी नोंद झाली, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

20 दिवसांपूर्वी अशीच औरंगाबादवर झाली होती ढगफुटी

20 दिवसांपूर्वी म्हणजेच 07 सप्टेंबर रोजी देखील औरंगाबाद शहरावर अशाच प्रकारे ढगफुटी झाली होती. 07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पुढच्या दोन-तीन मिनिटात पावसानं रौद्र रुप धारण केलं. त्यानंतर आकाशात प्रचंड वीजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. तीस मिनिटात म्हणजे 7:40 मिनिटापर्यंत पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा 166:75 मिमी असा नोंदवला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत 56:2 मिमी पावसाची नोंद झाली होती. सामान्यपणे ढगफुटीदरम्यान ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते.

इतर बातम्या- 

Aurangabad Crime:  9 महिन्यात 62 गुन्ह्यांची उकल करण्यात श्वानांची मदत, औरंगाबाद पोलीस दलातील प्रशिक्षित श्वानांची कामगिरी  

Aurangabad | नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने केली सुटका

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.