AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद शहराला जोडणारा अंजना नदीवरील पूल खचला, पुरामुळे नागरिकांचे हाल

औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची परिस्थिती जास्तच भीषण आहे. जिल्ह्यातील अंजना नदीवरील पूल खचला आहे. खचलेल्या पुलावरून मुसळधार पाणी वाहत आहे.

औरंगाबाद शहराला जोडणारा अंजना नदीवरील पूल खचला, पुरामुळे नागरिकांचे हाल
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 6:24 PM
Share

औरंगाबाद : अतिवृष्टीने मराठवाड्यात थैमान घातले आहे. येथील नद्या दुथडी भरुन वाहत असून त्यांना पूर आला आहे. पुरामुळे अनेक रस्ते खचले आहेत. तसेच पूलदेखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तर ही परिस्थिती जास्तच भीषण आहे. जिल्ह्यातील उपळी गावातील अंजना नदीवरील पूल खचला आहे. खचलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

जीव धोक्यात घालून करावा लोगतोय प्रवास  

मिळालेल्या माहितीनुसार उपळी गावाच्या परिसरात असलेला अंजना नदीवरील पूल खचला आहे. पूल खचल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पुलावरुन पाणी जात असले तरी नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसत आहेत. पूल खचल्यामुळे उपळी भराडी गावाचा संपर्कही तुटला

गेल्या 8 दिवसांपासून उपळी गावाचा संपर्क तुटलेला असून प्रशासनाने नागरिकांची कोणतीही दखल घेतलेली नाही. महत्त्वाची कामे असल्यामुळे येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून तालुक्यापर्यंत पोहोचावं लागत आहे.

पिसादेवी गावाचा संपर्क तुटला

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी गावाला जोडणारा पूलही वाहून गेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे पिसादेवी या गावाचा संपर्क तुटला आहे. अजूनही नदीमधील पाणीपातळी कमी झालेली नसून गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. येथे पुराच्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय.

चक्रिवादळाचा परिणाम आणखी चार दिवस

दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून मराठवाड्याला जेरीस आणलेला पाऊस आता कधी एकदा परतीच्या वाटेनं जातोय, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 6 ऑक्टोबरपासून मान्सून परतीच्या वाटेवर निघेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र मराठवाड्यात पुढील चार दिवस चक्रिवादळाचा परिणाम कायम राहील, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

इतर बातम्या :

घटक्यात कडक ऊन, घटक्यात पावसाचा धिंगाणा… काय चाललंय काय? ऑक्टोबर हीट सुरु की पावसाळाच लांबला? वाचा सविस्तर…

Photo Story: काहीच राहिलं नाही… पाणीच पाणी आहे…; देवेंद्र फडणवीसांची अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी

पाईपच्या एका बाजूने पडला तरुण, दुसऱ्या बाजूने बाहेर, पिसादेवीत थोडक्यात दुर्घटना टळली

(Anjana river bridge swept away with river water aurangabad villagers facing problems)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.