AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | महापालिकेची घंटागाडी वेळेवर येत नाही? औरंगाबादकरांनो, कॉल करा आणि 5 तासात समस्या दूर करा

औरंगाबादः शहरातील घरा-घरांतील कचरा नियमितपणे उचलला जावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा जबाबदार असते. औरंगाबादमधील (Aurangabad city) कचरा संकलनासाठी (Garbage Collection) महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमधील नागरिकांची, घंटागाडी नियमितपणे येत नाही, कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो, अशा तक्रारी असतात. स्मार्ट सिटीच्या (Smart city) वॉर रुममध्ये मागील पंधरा दिवसात अशा बऱ्याच तक्रारी आल्या […]

Aurangabad | महापालिकेची घंटागाडी वेळेवर येत नाही? औरंगाबादकरांनो, कॉल करा आणि 5 तासात समस्या दूर करा
औरंगाबाद महापालिकेच्या वतीने घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः शहरातील घरा-घरांतील कचरा नियमितपणे उचलला जावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा जबाबदार असते. औरंगाबादमधील (Aurangabad city) कचरा संकलनासाठी (Garbage Collection) महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमधील नागरिकांची, घंटागाडी नियमितपणे येत नाही, कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो, अशा तक्रारी असतात. स्मार्ट सिटीच्या (Smart city) वॉर रुममध्ये मागील पंधरा दिवसात अशा बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. मात्र ज्या भागात घंटागाडी नियमितपणे येत नाही, त्या नागरिकांनी पुढे येत महापालिकेकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वॉर रुमच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कचरा संकलनासाठी महापालिकेची व्यवस्था काय?

शहरातील कचरा संकलनाच्या कामाचे खासगीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने हे काम बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. सध्या याच कंपनीकडून घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन होते. हे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी कचऱ्यासंबंधीच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात आहेत. स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये 1मार्चपासून आतापर्यंत नागरिकांनी 60 तक्रारी केल्या आहेत. यात घंटागाडी वेळेवर येत नाही, घंटागाडी आलीच नाही, कचरा पडून आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश आहे.

कुठे करणार तक्रार?

एखाद्या भागात कचरा पडून असेल किंवा घंटागाडी वेळेवर येत नसेल तर नागरिकांना वॉर रुमकडे तक्रार करता येते. ही तक्रार 8055505002 किंवा 8055128080 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवर तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पाच तासात तक्रार निवारण

स्मार्ट सिटीच्या वॉर रुममध्ये तक्रार दाखल झाल्यावर ती तक्रार रेड्डी कंपनीकडे वर्ग केली जाते. या तक्रारीच्या निवारणासाठी कंपनीला जास्तीत जास्त पाच तासांची मुदत देण्यात आली आहे. या वेळेतच तक्रारीचे निवारण करून संबंधित तक्रारदारास त्याबाबतची माहिती कळवणी कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे घंटागाडीविषयी तक्रार असलेल्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

शरीरातील ‘या’ घटकाच्या कमतरतेने होतात हे पाच आजार…

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.