AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | क्रूरकर्म्यांनी शरम आणली! आधी लाकडी दांड्यानं ठेचलं, मृतदेहाला अंघोळही घातली, स्वच्छ करून घाटीत नेलं, औरंगाबाद सुन्न!

औरंगाबादः आठ जणांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने बेदम (Young man beaten) मारून त्याचा जीव घेतल्याची (youth murder) घटना काल औरंगाबादेत घडली. मारहाणीच्या या घटनेने औरंगाबादमध्ये काल खळबळ माजली. ही मारहाण नेमकी का झाली यामागचं कारण कालपर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र घटनेचा पूर्णपणे उलगडा झाला असून अगदी किरकोळ कारणामुळे इतक्या क्रूरपणे जीव घेण्याचं कृत्य केल्याचं उघडकीस आलं […]

Aurangabad | क्रूरकर्म्यांनी शरम आणली! आधी लाकडी दांड्यानं ठेचलं, मृतदेहाला अंघोळही घातली, स्वच्छ करून घाटीत नेलं, औरंगाबाद सुन्न!
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 12:00 PM
Share

औरंगाबादः आठ जणांनी एका तरुणाला लाकडी दांड्याने बेदम (Young man beaten) मारून त्याचा जीव घेतल्याची (youth murder) घटना काल औरंगाबादेत घडली. मारहाणीच्या या घटनेने औरंगाबादमध्ये काल खळबळ माजली. ही मारहाण नेमकी का झाली यामागचं कारण कालपर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र घटनेचा पूर्णपणे उलगडा झाला असून अगदी किरकोळ कारणामुळे इतक्या क्रूरपणे जीव घेण्याचं कृत्य केल्याचं उघडकीस आलं आहे. लाईट फोकस चोरल्याच्या संशयावरून वॉचमन असलेल्या या तरुणाचे हात पाय बांधून आठ जणांनी ठेचून मारल्याचं समोर आलं आहे. 20 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनेत मनोज शेषराव आव्हाड याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी सात आरोपींना (police arrest) बेड्या ठोकल्या आहेत.

काय घडला नेमका प्रकार?

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसरा, आरोपी सागर आणि सनी ही दिवंगत गणपत खरात यांची मुलं आहेत. खरात यांनी महापालिकेकडून मेघावाले सभागृह भाड्याने घेतले आहे. मनोज तेथे वॉचमन होता. चार दिवसांपूर्वी तेथे कार्यक्रमातून महिलेचा मोबाइल चोरीला गेला. तो मनोजने चोरल्याचा संशय होता. मात्र त्याने नकार दिला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. दोन दिवसांपूर्वी तेथून लाइट फोकस चोरीला गेले. मनोजला बुधवारी दुपारी आरोपींनी घरून मेघावाले हॉलमध्ये नेले. तेथे चोरीची कबुली देण्यासाठी त्याला मारहाण केली. तो मान्य करत नसल्याने त्याचे हात पाय बांधले आणि लाकडी दांड्याने त्याला ठेचत राहिले. या मारहाणीत तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला घाटीत नेऊन टाकले.

मृतदेहाला अंघोळ घातली, मग घाटीत नेले

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून आणखी धक्कादायक माहिती समोर आली. मनोजची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी त्याचे फाटलेले कपडे, रक्ताचे डाग पाहून डॉक्टरांना संशय येऊ नये म्हणून त्याला स्नान घातले. रक्ताचे डाग स्वच्छ पुसून दुसरे कपडे चढवले आणि नंतर घाटी रुग्णालयात नेले. आरोपींनी मनोजला घाटीत दाखल केले. डॉक्टरांना ही व्यक्ती जळगाव रोडवर बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचे सांगितले. त्यांनी त्याचे नाव आणि गावही माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी अनोळखी तरुण अशीच नोंदणी सुरुवातीला केली.

औरंगाबाद शरमला, औरंगाबाद सुन्न

चोरीच्या संशयावरून माणुसकीलाही लाजवेल एवढ्या क्रूरपणे मनोजची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे औरंगाबाद हादरला आहे. विशेष काही मारेकरी मारत असताना इतर आरोपींनी या घटनेचे व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यामुळे घटनेतील क्रौर्य अधिकच ठळकपणे दिसून आले.

इतर बातम्या-

Corona Update : 24 तासात कोरोनाचे 2451 नवीन रुग्ण; 54 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, जाणून घ्या किती आहे रिकव्हरी रेट

राऊतांचं ‘रहाटे’ तर खडसेंचं ‘खडसणे’! फोन टॅपिंगआधी देण्यात आलेल्या नावांबाबत सगळ्यात मोठा खुलासा

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.