AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हजेरीपटावर सोमवारच्या सह्या रविवारीच केल्या, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं!

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांनी सोमवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास बांधकाम, सिंचन, वित्त विभागांना अचानक भेट दिली. यावेळी 75 कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.

हजेरीपटावर सोमवारच्या सह्या रविवारीच केल्या, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं!
औरंगाबाद जिल्हा परिषद
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 3:21 PM
Share

औरंगाबादः सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अनेक वर्षांपासून टीका केली जातेय. काही प्रामाणिक कर्मचारी वगळता इतरांचा कामाचा वेग आणि उत्साह यावर नेहमीच प्रश्नचिन्ह ठेवले जाते. औरंगाबादेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांनी सोमवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास बांधकाम, सिंचन, वित्त विभागांना अचानक भेट दिली. यावेळी 75 कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी तर सोमवारच्या तारखेवर रविवारीच सह्या केल्याचे दिसून आले.

हजर, गैरहजर कर्मचाऱ्यांची नोंदच नाही

शासकीय कार्यालयांचा पाच दिवसांचा आठवडा सुरु झाल्यापासून सकाळी कार्यालय उघडण्याची वेळ पावणे दहा अशी ठेवण्यात आली आहे. मात्र अनेक कर्मचारी साडे दहा वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. काहीजणांनी रजा लिहून हजेरीपटात ठेवल्या होत्या. मात्र कार्यालय प्रमुखांकडून त्या मंजूर झाल्या नव्हत्या. काहीजण दीर्घ रजेवर होते, पण त्यांच्या नोंदी मस्टरवर नव्हत्या.

कोणत्या विभागाचे किती कर्मचारी?

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी जिल्हा परिषद आवार, नारळीबाग, घाटी परिसरातील विभागांना भेट दिली. या झडतीत बांधकाम व वित्त विभागाचे सर्वाधिक 17 कर्मचारी गैरहजर होते. तर सिंचन विभागाचे 7, पंचायतचे 4, पशुसंवर्धन 1, स्वच्छ भारत मिळन 9, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 3, ग्रामीण आरोग्य अभियानाचे 10 कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.

अहवाल सीईओंना पाठवला

सकाळी साडे दहा वाजले तरी कर्मचारी कार्यालयात दिसून न आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाल्याने जिल्हा परिषदेतील बहुतांश विभाग स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखे झाले आहे. या झडतीत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले.

इतर बातम्या-

दिल्लीत आज ओबीसी परिषद, लालू, शरद यादव येणार; भुजबळ राजधानीत शक्तीप्रदर्शन करणार?

Devendra Fadanvis: आघाडीने लोकशाही कुलूप बंद केली, राज्यात ‘रोकशाही, रोखशाही’ सुरू! फडणवीसांचा घणाघात

ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.