AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत 24 तासात डझनभर घरं फोडली, रात्र गस्तीवर आयुक्तांची नाराजी, ठाणेदार जबाबदार!

औरंगाबादः दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांसाठी पोलिसांकडून (Aurangabad Police) आपला शेजारी खरा पहारेकरी हे अभियान राबवण्यात येते. मात्र पोलिसांचे हे अभियान चोरांच्या कारस्थानांपुढे फिके पडल्याचेच चित्र दिसत आहे. औरंगाबादेत गेल्या 24 तासात 13 ते 15 घरे फोडून (Theft in Aurangabad) चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गेल्या आठवडाभरात गारखेडा, किलेअर्क, सिडको, बीड बायपास या भागात […]

औरंगाबादेत 24 तासात डझनभर घरं फोडली, रात्र गस्तीवर आयुक्तांची नाराजी, ठाणेदार जबाबदार!
औरंगाबादमध्ये पोलिसांचे अभियान फिके, 24 तासात 13 घरफोड्या
| Edited By: | Updated on: Nov 09, 2021 | 10:09 AM
Share

औरंगाबादः दिवाळीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांसाठी पोलिसांकडून (Aurangabad Police) आपला शेजारी खरा पहारेकरी हे अभियान राबवण्यात येते. मात्र पोलिसांचे हे अभियान चोरांच्या कारस्थानांपुढे फिके पडल्याचेच चित्र दिसत आहे. औरंगाबादेत गेल्या 24 तासात 13 ते 15 घरे फोडून (Theft in Aurangabad) चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. गेल्या आठवडाभरात गारखेडा, किलेअर्क, सिडको, बीड बायपास या भागात तर रविवारी रात्री वानखेडेनगर, एन-13 भागातील आणखी पाच घरे फोडून चोरांनी पोलिसांची झोप उडवली. म्हणजेच गेल्या आठव़डाभरापासून चोरांनी तब्बल 17 घरे फोडून औरंगाबाद पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.

एकाच गल्लीतली पाच घरं फोडली

रविवारी मध्यरात्री चोरांनी वानखेडेनगर, एन-13 भागातील एकाच गल्लीतली पाच घरं फोडली. या नगरातील संदीप सुहास साळुंके हे आजीच्या अंत्यविधीसाठी गावी गेले होते. हीच संधी साधून चोराने त्यांचे घर फोडत दहा हजार रुपये लांबवले. त्यांच्याच शेजारी राहणारे पोस्टमन दीपक श्रीचंद पवार हेसुद्धा बाहेरगावी गेले होते. मध्यरात्री चोरींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 14 ग्रॅम सोन्याचे गंठण, चेन, लॉकेड, पेंडंट, अंगठी असे पावणेतीन लाखांचे दागिने लंपास केले. मयूर संदीप देवकर हे फायनान्स कंपनीतील कर्मचारी दुपारपर्यंत औरंगाबादेत दाखल झाले नव्हते. त्यांचेही घर चोरांनी फोडले. तर गजानन गिरनारे या कामगाराचे घर फोडून पाच ग्रॅमचे कानातले, तीन ग्रॅमचे मणी असे आठ ग्रॅमचे दागिने लांबवण्यात आले. अजून एक बंद घरही चोरट्यांनी फोडले, मात्र तिथे त्यांच्या हाती काही लागले नाही. पोलिसांनी सोमवारी सकाळीच श्वानपथकासह इथे धाव घेतली. मात्र आरोपींचा माग काढण्यात त्यांना यश आले नाही. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

शनिवारी रात्रीदेखील शहरात अनेक घरफोड्या झाल्या. त्यावर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी रात्र गस्तीवर नाराजी व्यक्त केली. रात्र गस्त वाढवण्यास सांगितले असताना अनेक ठाणे प्रभारींनी हे गांभीर्याने घेतले नाही. अनेकजण रात्र गस्त करताना आढळले नाहीत. यापुढे घरफोडी झाल्यास आणि रात्र गस्तीदरम्यान उपलब्ध असलेली वाहने व पोलीस तैनात करण्यात अपयशी ठरणाऱ्या ठाणेदारांना चोऱ्यांसाठी जबाबदार धरले जाईल, अशी तंबी पोलीस आयुक्तांनी एका विशेष संदेशाद्वारे दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर रविवारी पुन्हा बेगमपुरा ठाण्याच्या हद्दीत पाच घरे फोडण्यात आली. त्यामुळे वरिष्ठांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

इतर बातम्या-

Aurangabad: लेबर कॉलनीवरची कारवाई तूर्त टळली, पालकमंत्र्यांना रहिवाश्यांची भावनिक साद, नोटीस रद्द करण्याची मागणी

आनंदवार्ताः मंदीचे मळभ हटले, पर्यटकांनी बहरली औरंगाबादची अजिंठा लेणी, 3 दिवसात 8 हजारांवर पर्यटक

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.