AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panchakki | नहरीमधून पाणी आणलं, तंत्रज्ञान, स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना; वारसा जपणाऱ्या पानचक्कीला भेट दिलीत ?

औरंगाबाद शहरातील हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून ते निजामकालीन आहे. येथे पाण्यावर चालणारी चक्की (पिठाची चक्की) आहे. याच कारणामुळे या ठिकाणाला पानचक्की असे म्हणतात. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते.

Panchakki | नहरीमधून पाणी आणलं, तंत्रज्ञान, स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना; वारसा जपणाऱ्या पानचक्कीला भेट दिलीत ?
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 8:18 AM
Share

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याला राज्याची पर्यटन राजधानी म्हटलं जातं. या जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा जपून ठेवणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या जिल्ह्यातील गड, किल्ले, दरवाजे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि कुतूहल निर्माण करणारे ठिकाण म्हणजे पानचक्की होय. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा खुबीने केलेला वापर पाहण्यासारखा आहे.

पानचक्की म्हणजे काय ?

औरंगाबाद शहरातील हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून ते निजामकालीन आहे. येथे पाण्यावर चालणारी चक्की (पिठाची चक्की) आहे. याच कारणामुळे या ठिकाणाला पानचक्की असे म्हणतात. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते. नंतर हेच पाणी 20 फुट उंचीवरुन एका मानवनिर्मित धबधब्याच्या स्वरुपात एका मोठ्या हौदमध्ये पडते. हे ठिकाण म्हणजे मध्ययुगीन अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण आहे.

पानचक्की सतराव्या शतकातील वास्तू

पाणचक्कीमध्ये पाण्याच्या दाब निर्माण करुन दगडी जाते फिरवण्याची किमया साध्य केलेली आहे. ही कल्पना तब्बल 400 वर्षांपूर्वीच अमलात आणलेली आहे. ही चक्की उभी करण्यात मलिक अंबरचे मोठे योगदान आहे. त्याने नहरींच्या माध्यमातून पानचक्की या ठिकाणावर पाणी आणले. तसेच 17 व्या शतकाच्या सुरुवातीला आणि उत्तरार्धात अशा दोन भागात या पानचक्कीचे बांधकाम झाले. सुरुवातीला मलिक अंबरने ‘नहर-ए-अंबरी’चे काम केले होते.

 भिंतीवर नेण्यात आलेले पाणी नंतर हौदामध्ये पडते

नंतर सतराव्या शतकात ‘नहर-ए- पाणचक्की’चे बांधकाम करण्यात आले. पाणचक्कीच्या या परिसरात सुफी संत बाबा शहा मुसाफीर हे राहत असत. मुसाफीर यांचे शिष्य बाबा शहा महमूद यांनी या पानचक्कीचे बांधकाम केलेले आहे. नहरीमधून आणलेले पाणी नंतर भिंतीवर नेण्यात आले. तेच पाणी नंतर खालच्या हौदात पडते. पाणी खाली पडताना मोठा धबधबा निर्माण होतो. हाच धबधबा पाहण्यासाठी लोक या स्थळाला आवडीने भेट देतात.

पानचक्कीच्या हौदाचे वैशिष्य काय आहे ?

भिंतीवर नेण्यात आलेले पाणी नंतर थेट खाली हौदात पडते. हा हौद साधारणत: 160 फूट लांब आणि 31 फूट रुंद आहे. या हौदात पडणारे पाणी नंतर खाम नदीत जाते. येथे एक मशीदसुद्धा आहे. या मशिदीचे बांधकाम मनाला भुरळ घालणारे आहे. अशा या उत्कूतेने भरलेल्या ठिकाणाला एकदातरी भेट द्यायलाच हवी.

इतर बातम्या :

Aryan Khan drugs case | समीर वानखेडे यांना आर्यन खानप्रकरणातून हटवलं, आता तपास थेट एनसीबीच्या दिल्ली टीमकडे

आधी सूचक ट्विट, नंतर जाहीर आरोप, आता समीर वानखेडेंना डच्चू, ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यात मलिक यांना यश ?

तुरुंगातून सुटल्यानंतर आर्यन खान काय वाचतोय?; स्वीडिश लेखकाचं हे पुस्तक माहीत आहे काय?

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.