Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omicron Effect: विमान कंपन्या पुन्हा संकटात, प्रवासी घटले, औरंगाबाद-मुंबई इंडिगो विमानाच्या तिकिटात घट!

दिवसेंद्विस प्रवाशांची संख्या घटत असल्याने इंडिगोने औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमान तिकिटात कपात केली आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांतच विमानप्रवास उपलब्ध झाला आहे.

Omicron Effect: विमान कंपन्या पुन्हा संकटात, प्रवासी घटले, औरंगाबाद-मुंबई इंडिगो विमानाच्या तिकिटात घट!
बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण विमान दुर्घटना टळली
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 1:12 PM

औरंगाबादः राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे चित्र असताना प्रवासावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. ओमिक्रॉनच्या धास्तीने अनेकजण स्वतंत्र रितीने प्रवास करण्यावर भर देत आहे. त्यामुळे विमान कंपन्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. दिवसेंद्विस प्रवाशांची संख्या घटत असल्याने इंडिगोने औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या विमान तिकिटात कपात केली आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी दोन ते तीन हजार रुपयांतच विमानप्रवास उपलब्ध झाला आहे.

ओमिक्रॉनच्या धास्तीने प्रवाशांत घट

औरंगाबादहून विमानाने मुंबईला प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र ओमिक्रॉनची धास्ती आणि प्रत्येकाची RTPCR चाचणी करण्यात येत असल्याने अनेकांनी स्वतःच्या वाहनाने मुंबईला जाणे पसंत केले आहे. यामुळे विमान प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. सध्याच्या स्थितीत विमानात निम्मेच प्रवासी असूनही एवढ्यावरच उड्डाण करण्याची वेळ विमान कंपन्यांवर आली आहे. आगामी काळात प्रवासी आणखी घटतील, या भीतीने इंडिगोने मुंबईच्या तिकिटात मोठी कपात केली आहे. यामुळे प्रवासी काही प्रमाणात वाढतील, अशी इंडिगो प्रशासनाला आशा आहे. मुंबईला जाण्यासाठी अनेकदा 10 हजारांपेक्षाही जास्त तिकिट मोजावे लागतात. आता मात्र हे तिकिट तीन हजार रुपयांपर्यंत घसरले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी 16 कोरोना रुग्णांची भर

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही हळू हळू वाढताना दिसत आहे. गुरुवारी सङरात 14 तर ग्रामीण भागात दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात सध्या 61 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून गुरुवारी 12 रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. यातील दहा रुग्ण शहरातील तर दोघे ग्रामीण भागातील आहेत.

इतर बातम्या-

Healthy Breakfast: नाश्त्यात काय खाणार, ओट्स की फ्लेक्स; माहिती करून घ्या काय आहे हेल्दी?

1 जानेवारीपासून Zomato आणि Swiggy वरुन जेवण ऑर्डर करणं महागात पडणार! जाणून घ्या कारण

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.