AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरोपींना जन्मठेप | महाराष्ट्राला हादरवणारा सोनी हत्याकांडात तिहेरी हत्या कशासाठी झाली होती

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना जन्मठेप झाली. आरोपींनी ही हत्या का घडवली होती. मग पोलिसांच्या सापळ्यात ते कसे आले, पाहू या...

आरोपींना जन्मठेप |  महाराष्ट्राला हादरवणारा सोनी हत्याकांडात तिहेरी हत्या कशासाठी झाली होती
| Updated on: Apr 11, 2023 | 5:07 PM
Share

तेजस मोहतुरे, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरातील बहुचर्चित सोनी हत्याकांडाचा निकाल आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तीवाद केला होता. या हत्याकांड प्रकरणी सात आरोपींवर आरोप सिद्ध झाले होते. त्यात सर्व सात आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षा झाली. परंतु हे हत्याकांड कशासाठी झाले होते.

तुमसर शहरातील रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या संजय चिमणलाल सोनी (47), पुनम संजय सोनी (43), ध्रुमिल संजय सोनी (11) ह्या एकाच कुटुंबातील तिघा लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या झाली होती. ही हत्या कोणी बाहेरच्या व्यक्तीने केली नव्हती तर त्यांचा चालकाने कट रुचून हत्या केली होती.

का केली होती हत्या

सराफाचा व्यवसाय संजय सोनी करत होते. व्यवसायानिमित्त ते सोन्या-चांदीची दगिन्यांची विक्री करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जात होते. नेहमीप्रमाणे 25 फेब्रुवारी2014 ला संजय सोनी यांनी चालकाला गोंदियाला जाण्यासाठी फोन केला. संजय सोनी गोंदियाला कशाला जातात हे चालकाला माहीत होते. त्यामुळे त्याने कट रुचून त्यात सहा जणांना सहभागी करुन घेतले.

अशी केली हत्या

संजय सोनी 26 फेब्रुवारीला चालकाला घेऊन गोंदियाला गेले. कामे आटोपून ते रात्री गावी तुमसरला परत निघाले. गोंदिया जिल्ह्यातील बिरसी फाट्याजवळ चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबवली. त्या ठिकाणी चालकांचे तीन साथीदार आधीच थांबले होते. त्याने त्यांना तुमसरपर्यंत जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. गाडीत नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली.

हत्येचा बनाव उघड

हत्यानंतर संजय यांचा मृतदेह घेऊन हे सर्वच लोक संजय सोनी यांच्या निवासस्थानी गेले. घरी जाऊन त्यांनी साहेबांना भोवळ आल्याचे सांगितले. त्यानंतर संजय सोनी यांचा मुलगा ध्रूमिल याची गळा आवळून हत्या केली. त्यांची पत्नी पूनम सोनी यांचीही त्यांनी हत्या केली. तीन हत्या केल्यानंतर तिजोरीतील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी घेऊन चोरटे पसार झाले. मात्र जाण्यापूर्वी हे तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले अन् घरात दरोडा पडल्याचा देखावा केला. परंतु पोलिसांनी तपास करुन चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्याकडून सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.

हे आहेत आरोपी

या हत्याकांडातील ७ ही आरोपींना कलम 302, 394 सह विविध आरोपा खाली दोषी ठरविण्यात आले आहे. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख (22), महेश आगाशे (26), सलीम पठाण (24), राहुल पडोळे (22), केसरी ढोले (22) रा.तुमसर, सोहेल शेख (26), रफीक शेख (42) रा.नागपूर यांचा समावेश आहे.

800 पानांचे आरोपपत्र 

 या हत्याकांड प्रकरणी 800 पानांचे आरोपपत्र सोनी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या तुमसर पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते. पोलिसांना याशिवाय केमिकल आणि डीएनए अहवालासह अन्य अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले होते. या पुराव्याच्या आधारे आरोपींवरील गुन्हा सिद्ध झाला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.